Fadnavis On Loan waiver : अजितदादानंतर फडणवीसांनीही सांगितले पुढची तीन वर्षे कर्जमाफी नाहीच; म्हणाले, ‘अजितदादांची भूमिका तीच सरकारची भूमिका’

Devendra Fadnavis Pandharpur Tour : श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडून पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पाहिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी अजितदादांची पाठराखण करताना तीन वर्षे कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 28 March : राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता पुढील तीन वर्षे तरी कर्जमाफी शक्य नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजितदादांच्या त्या विधानावरून राज्यात सध्या जोरदार गदारोळ उठला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आगामी तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी होणार नाही, हे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडून पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पाहिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी अजितदादांची पाठराखण करताना तीन वर्षे कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादांनी शेतकरी कर्जमाफीबाबत (Farmer Loan waiver) घेतलेली भूमिका योग्य आहे. अजितदादांची जी भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका आहे, त्यांनी कधीही शक्य नाही, असे बोलले नाहीत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आगामी तीन वर्षे तरी कर्जमाफी होणारच नाही, असे स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Solapur Tour : फडणवीसांनी नाकारला आपल्या प्रिय आमदाराचा पुष्पगुच्छ; कारणही आले पुढे! (Video)

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली होती, त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मोठी असल्याचे मानले जात आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने महायुतीला पुन्हा मतदान केले. मात्र, कृषी कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना आणखी तीन वर्षे वाट पाहावी लागणार, हे आता स्पष्ट आहे.

Devendra Fadnavis
Atul Londhe : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना भाजपने दिली वाढदिवसाची ‘विशेष’ भेट!

अजित पवारांनी काय म्हटले होते?

हो मी मान्य करतो की कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते. मात्र, सगळी सोंग करता येतात, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. विधानसभा निवडणुकीत आम्ही आश्वासन दिले होते. पण, सद्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षे तरी कर्जमाफी देणे शक्य नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात झालेल्या शेतकरी मेळाव्यात सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com