Kolhapur IT Park : मागूनही मिळत नसलेल्या प्रकल्पाला राजेश क्षीरसागरांनी खेचून आणलं, कोल्हापुरात आयटी पार्क होण्याचा मार्ग मोकळा

Kolhapur IT Park News: कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात आयटी पार्क कधी होणार अशी विचारणा सातत्यानं केली जात होती. याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. एकाच वेळी महायुतीचे तब्बल 10 आमदार निवडून देणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

कोल्हापूरमधील आयटी पार्कसाठी 100 एकर जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतची राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिली आहे.

कोल्हापूरला (Kolhapur) आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. कोल्हापुरात आयटी पार्कसाठी जागा देण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित होता. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात आयटी पार्कचा मुद्दा लक्षवेधीद्वारे मांडला होता.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बैठक घेवून कोल्हापूर आयटी पार्कचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सभागृहात आश्वासित केलं होतं. राज्य सरकारनं जागा प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर कोल्हापूर शहरातील आयटी पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Rajesh Kshirsagar
Nilesh Rane : निलेश राणेंनी नवा बॉम्ब फोडला, अधिकारी भ्रष्टाचारी म्हणत विधीमंडळात थेट आकडाच सांगितला; सरकारही हादरलं

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले असून, शेंडा पार्क येथील आयटी पार्कसह इतर शासकीय प्रयोजनांसाठी आवश्यक जागा मागणी प्रस्तावास सरकारनं मंजुरी दिली आहे.

पावसाळी अधिवेशनात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी ‘आमदार क्षीरसागर यांनी आयटी पार्कसाठी शेंडापार्क येथे मागणी केलेल्या जमिनीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 ऑक्टोबर 2023 व 1 एप्रिल 2025 रोजी बैठक घेवून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचं म्हटलं होतं.

Rajesh Kshirsagar
Raju Shetti News: राजू शेट्टींचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गंभीर आरोप; म्हणाले,'मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर..'

सरकारकडून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आयटी पार्कसाठी 34.76 हेक्टर जमीन मागणी करण्यात आली असून संबंधित जमीन कृषी विद्यापीठाची असल्याचं मंत्री म्हणाले होते. तसेच कृषि विद्यापीठाने या आयटी पार्कसाठीच्या जागेच्या बदल्यात इतरत्र जागा देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तीन ते चार तालुक्यातील जागा दाखविण्यात आल्याचंही नाईक यांनी सांगितलं यावेळी सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com