Kolhapur News : मणिपूरमधील महिला अत्याचारा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी मागील तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेट्टी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आयजीएम रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. (Raju Shetti hunger strike On Manipur Issue)
सलग तीन दिवसांच्या अन्नत्यागामुळे शेट्टी यांच्या प्रकृतीत बिघाड झाली आहे. युरिनमध्ये कीटोनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डिहायड्रेशन, थकवा, तापाचा त्रास होऊन शरीरावर याचे परिणाम होण्याची संभावना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान मणिपूरसह देशातल्या महिला अत्याचारांच्या निषेधार्थ राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात कँडल मार्च काढण्यात आला होता. यावेळी इचलकरंजीतील महिलांनी मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभाग नोंदवला होता. काल सायंकाळीच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला.
मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही. महिलांवरील अत्याचाऱ्याच्या व्हिडिओमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र आता अन्नत्यागाच्या तिसऱ्या दिवशी राजू शेट्टींची प्रकृती बिघडली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.