Rahul Gandhi News : 'नरेंद्र मोदींची सवय आहे की, जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते..'; सोलापूरच्या सभेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Solapur Lok Sabha Constituency : काँग्रेस पक्ष महालक्ष्मी योजना आणणार, यासाठी गरीब लोकांची यादी तयार करून गरीब व्यक्तीच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा करणार..
rahul gandhi narendra modi
rahul gandhi narendra modisarkarnama

Solapur News : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसची नेते राहुल गांधी यांची बुधवारी सोलापूर येथे जाहीर सभा झाली. महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली. मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकांमुळे केवळ ठराविक जणांचा फायदा झाला असून, गरिबांवर मोठा अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला.

सभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, नरेंद्र मोदींनी देशाला अन्यायाची राजधानी बनविले आहे. मोदी हे श्रीमंतांच्या फायद्याचे निर्णय घेतात. अदानीचे कर्ज माफ करतात. मात्र सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस पक्ष देशातील शेतकरी, दलित, गरिबांचे कर्ज माफ करणार आहे. जे श्रीमंतांच्या मुलाला मिळते तेच गरिबाच्या मुलालादेखील मिळणार आहे. केंद्रात आमचं सरकार आल्यावर देशात जातनिहाय जनगणना करणार. मोदी हे अरब पतींचे नेते आहेत, गरिबांचे नाहीत, असा घणाघात गांधी यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

rahul gandhi narendra modi
Lok Sabha Election 2024 News : तर 'या' सात मतदारसंघातील उमेदवार पहिल्यांदाच चढणार संसदेची पायरी !

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर एक योजना आणण्याचा मानस राहुल गांधी यांनी बोलून दाखविला आहे. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष महालक्ष्मी योजना आणणार आहे. यासाठी गरीब लोकांची यादी तयार करून गरीब व्यक्तीच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये दिले जातील. प्रत्येक वर्षी पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावरदेखील एक लाख रुपये दिले जातील. देशातील शेतकऱ्यांची (Farmer) कर्जमाफी करणार हे आमचे अंतिम ध्येय नाही तर ही फक्त सुरुवात आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक कमिशन नेमणार आहे. हे कमिशन शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफीची शिफारस करेल तेव्हा तेव्हा त्यांचे कर्ज माफ करेल. याबरोबरच देशातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देणार, असा शब्द राहुल गांधी यांनी दिला.

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींची सवय आहे की, जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते खोटं बोलायला सुरू करतात. जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते पाकिस्तान, चायनाची गोष्ट करतात. मात्र आता काही झाले तरी यावेळेस ते सुटणार नाहीत. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) घाबरले आहेत. कारण त्यांना माहिती आहे. ही निवडणूक आपल्या हातून जात आहे. रस्त्यावर होणारी वाटमारी मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली आहे. हे सांगतायेत की आम्ही राजकीय भ्रष्टाचार संपवतोय, अशी टीकादेखील राहुल गांधी यांनी मोदींवर केली.

R

rahul gandhi narendra modi
Rohit Pawar News : अजितदादांना मोदी-शाहांचा व्हायरस; म्हणून ते पन्नास टक्के खोटे बोलू लागले; रोहित पवारांनी सुनावले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com