Prakash Ambedkar : 'मनोज जरांगेंची सोबत करणाऱ्यांबरोबर आम्ही नसणार'; प्रकाश आंबेडकर चौथ्या आघाडीच्या तयारीत

Prakash Ambedkar will form a new alliance with OBC and tribal : प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत न जाता राज्यात नवीन आघाडी स्थापन करणार.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी प्राधान्य दिलंय. 'वंचित'चे प्रकाश आंबेडकर यांनी देखील वेगळी भूमिका घेत जरांगेंसोबत जातील, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, असं स्पष्ट केलं.

आदिवासी, ओबीसी संघटनांना सोबत घेवून नवीन आघाडी स्थापन करू. याबाबत काहींशी चर्चा झालीय, मात्र हे आज सांगणार नाही, असे सांगून प्रकाश आंबेडकरांनी ते बांधत असलेल्या आघाडीबाबत उत्सुकता वाढवून ठेवली. आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत चौथी आघाडी दिसणार, असे संकेत मिळाले.

स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यात तिसऱ्या आघाडीची तयारी केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्याकडे देखील चाचपणीसाठी प्रस्ताव ठेवलाय. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje), बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी एकत्र येत राज्यात 'परिवर्तन आघाडी', ही तिसरी आघाडी स्थापन करण्याचा तयारीत आहेत. तशी चाचपणी सुरू केलीय. छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रस्तावावर जरांगे यांनी अजून भूमिका स्पष्ट केली नसली, तर त्यावर खल सुरू आहे.

Prakash Ambedkar
Rajendra Raut : माझं घरंबिर पेटविण्याचा जरांगे पाटलांचा विचार आहे काय..? आमदार राजेंद्र राऊतांचा सवाल

राज्यात सध्या 'वंचित' एकटा पडलेला दिसतोय. लोकसभा निवडणुकीत 'वंचित' स्वबळावर समोरे गेला. यावेळी त्यांच्याविषयी भाजपची 'बी' टीम म्हणून चर्चा झाली. आता विधानसभा निवडणुकीत 'वंचित' काय राजकीय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं होतं. यातच 'वंचित'चे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भूमिका मांडली.

Prakash Ambedkar
Supriya Sule : सरकारचा वेग 'गोगलगायी' एवढा? कोणत्या उपमुख्यमंत्र्यांची कबुली; सुप्रिया सुळेंनी टायमिंग साधलं

नवीन आघाडीची तयारी

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "वंचित राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्याच्या तयारी आहे. ओबीसी आणि आदिवासींना बरोबर घेऊन ही आघाडी स्थापन करू. याबाबत काही पक्षांसोबत चर्चा झाली आहे. कोणाबरोबर चर्चा झाली, याची नावं आता समोर आणणार नाही". तिसऱ्या आघाडीच्या संपर्कात नसून, जरांगे यांच्यासोबत जे जातील, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

सरकार तिजोरी खाली करून जाणार

प्रकाश आंबेडकर यांनी महायुती सरकारवर तोड डागली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं लाँच सरकार येणार नाही म्हणून केलं गेलं आहे. यांना खात्री आहे म्हणून, त्यांनी योजना लाँच केली. या योजनेतून सरकारने तिजोरी रिकामी करून ठेवल्याचा घणाघात आंबेडकरांनी केला. योजनेतून लाडक्या बहिणींना पाच हप्ते दिले जाणार आहेत. जाता जाता हे सरकार तिजोरी खाली करून जाणार आहे, असा टोला देखील प्रकाश आंबेडकर यांनी लागावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com