
Mumbai News : मुंबईला एक भाषा नाही. त्यामुळे मुंबई सोपी आहे. इथे येणाऱ्याने मराठी शिकलेच पाहिजे असे काही नाही, असे धक्कादायक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केले. ते गोवंडीमधील आयटीआयमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, जोशी यांच्या वक्तव्याने आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईला (Mumbai) एक भाषा नाही, अनेक भाषा आहेत. पण त्या त्या भागाची एक भाषा असते. घाटकोपरला गुजराती भाषा जास्त ऐकायला मिळते. तर गिरगावला हिंदी कमी आणि मराठी जास्त ऐकायला मिळते. त्यामुळे मुंबई सोपी आहे. इथे येणाऱ्याने मराठी बोलायला शिकलेच पाहिजे असे काही नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये मराठी (Marathi) विरुद्ध इतर भाषा हा वाद नित्याचाच बघायला मिळतो. अनेक सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाही किंवा मराठी माणलासा फ्लॅट दिला जाणार नाही, अशा पाट्या लागल्याचे आपण यापूर्वी बघितले आहे. याविरोधात आवाज उठवल्यानंतर अशा पाट्या काढून टाकल्या गेल्या अनेकदा लोकलमध्ये, बेस्टमध्येही मराठी आणि इतर भाषांमध्ये बोलण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
एका बाजूला राज्य सरकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा राजकीय पक्ष आणि सर्व सामान्य मराठी माणूस भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने दहा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी भाषा टिकावी आणि वाढावी यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. त्याचवेळी मराठी भाषेसाठी अशी उदासनिता दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.