Sambhaji Bhide Controversial Statement : 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करा, 'वाघ्या'चा पुतळा हवा; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide Shivrajyabhishek Ceremony : 'रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको.या कुत्र्याचे राजकारण करू नका, असे संभाजी भिडे म्हणाले.
Sambhaji Bhide addressing followers while calling for the permanent cancellation of the June 6 Shivrajyabhishek ceremony.
Sambhaji Bhide addressing followers while calling for the permanent cancellation of the June 6 Shivrajyabhishek ceremony.sarkarnama
Published on
Updated on

Sambhaji Bhide Statement : सहा जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भिडे म्हणाले, '6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे.शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे.तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत.'

सहा जूनच्या राज्याभिषेकाविषयी बोलताना भिडे यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर देखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, 'रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको.या कुत्र्याचे राजकारण करू नका. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत.'

वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, असे देखील भिडे यांनी सांगितले. तसेच वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे, असे मत व्यक्त देखील त्यांनी व्यक्त केले.

Sambhaji Bhide addressing followers while calling for the permanent cancellation of the June 6 Shivrajyabhishek ceremony.
Chhagan Bhujbal News: 'माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही, अमित शाहांचेही प्रयत्न, पण मी भाजपचा...'; छगन भुजबळांचं मोठं विधान

दु:ख वाटणे चुकीचे - जयंत पाटील

संभाजी भिडे यांनी सहा जूनचा राज्यभिषेक सोहळा बंद करण्याविषयीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, 'इतिहास जो आम्ही लहानपणापासून बघतो तो मोडीन काढायचा आणि नवीन व्यवस्था निर्माण करायचा, असे प्रयत्न काही लोक करत आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यांना दुःख वाटण्याची काय गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज महाराष्ट्रातील लोकांना अभिमान आहे. या अभिमानापोटी राज्याभिषेक सोहळा आयोजित केला जात असेल तर त्याला विरोध करायची काहीच गरज नाही. त्यामुळे ज्यांना या बाबतीत वाईट वाटत असेल तर त्यांचे दृष्टी तपासले पाहिजे.'

Sambhaji Bhide addressing followers while calling for the permanent cancellation of the June 6 Shivrajyabhishek ceremony.
Mahayuti Government: बावनकुळेंच्या महसूल विभागाचा 60 वर्षानंतर मोठा निर्णय; शेतीतील वाद मिटवण्यासाठी मोठं पाऊल,लाखो शेतकर्‍यांना होणार लाभ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com