
Shahajibapu Patil News : उद्धव ठाकरे यांनी आपण राजकारण एकाकी पडलो असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून एकनाथ शिंदेंचे विश्वासू माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, निवडणुका तोंडावर धरून भावनेच्या भरात केलेली हे विधानं आहे. उद्धव ठाकरे हे एकाकी नाहीत ते दररोज शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी अर्धा अर्धा तास फोनवर संवाद साधतात.
तीन वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रगती पथावर आहे तर संजय राऊत हे आज ही नारळाच्या झाडाखाली आहेत, अशी टीका शहाजीबापू यांनी केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी संधी मिळावी असं साकडं आपण विठुरायाला घातलं आहे.
अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे विठ्ठलला घातले आहे. त्यावर बोलताना शहाजीबापू म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. त्याप्रमाणे मला देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटते त्यासाठीच विठ्ठलाला साकडे घातले आहे की फडणवीस यांच्या नंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे.
मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचे फोटो व्हायरल होत आहे. त्यावर बोलताना शहाजीबापूंनी सांगितली ती अघोरी पूजा नव्हती तर धार्मिक पूजा होती. अघोरी पूजा होती की नाही हे पाहण्यासाठी आणि मंत्र ऐकण्यासाठी काय संजय राऊत तिथे गेले होते का? भरत गोगावलेंनी केलेली पूजा ही धार्मिक यज्ञ होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.