शिवसेनेला गुजरातचा पुळका काही सुटेना; शिंदेंच्या 'जय गुजरात'नंतर केंद्रीय मंत्र्याने टाकला नवा बॉम्ब! म्हणाले,'मुंबई गुजरातची...'

Prataprao Jadhav On Gujarat : राज्यात एकीकडे हिंदी सक्तीवरून वाद सुरू असतानाच शिवसेना अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने वाद उफाळला होता. तो वाद शांत होतो ना होतो तोच त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याच्या विधानावरून नवा वाद सुरू झाला आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर ‘जय गुजरात’चा नारा दिला. हा नारा त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिला. यावरून राज्यात वाद निर्माण झाला होता. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली होती. हा वाद शांत होत नाही तोच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. प्रतापराव जाधव यांनी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असा दावा केला आहे. ते धाराशिवमध्ये तुळजभवानीच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

पुण्यात शिंदे यांनी केलेल्या 'जय गुजरात' या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. विरोधकांनी यावरून जोरदार टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील विजयी मेळाव्यात याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला होता. आता याच मुद्द्याचे प्रतापराव जाधव यांनी समर्थन करताना दुसरे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

जाधव यांनी, महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य असताना मुंबई ही गुजरातची राजधानी होती. गुजरात हे आपल्या देशातील आणि आपले शेजारी राज्य आहे. ते काही पाकिस्तानातले नाही. यामुळे 'जय गुजरात' वक्तव्याचे राजकारण करण्याचे काही कारण नाही, असे म्हटले आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर सोमवारीही हा मुद्द्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून उचलून धरला जावू शकतो.

Eknath Shinde
Eknath Shinde On Raj-Uddhav Rally : राज-उद्धव ठाकरेंची एकत्रित सभा होताच एकनाथ शिंदे 'अ‍ॅक्टिव्ह', प्रतिक्रिया देताना म्हटले, 'खुर्चीप्रेमी, वेडापीसा...'

नेमकं काय म्हणाले प्रतापराव जाधव?

एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' या नाऱ्याचे समर्थन करताना, जाधव म्हणाले की, ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र होता. तेंव्हा मुंबई ही गुजरातचीही राजधानी होती. आताही मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात. गुजरात काही पाकिस्तानचा प्रांत नाही. ते आपल्या शेजारील राज्य आहे. एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर तेथील लोकांचा स्वाभिमान जपावा म्हणून आपण त्याच्या राज्याचा नारा देतो. तसाच नारा शिंदेंनी दिला. त्यात चुकीचं काहीच नाही. त्यामुळे या गोष्टीचे राजकारण करायची गरज नाही.

Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : मालक समोर आला अन् गद्दार 'जय गुजरात' म्हणाला; ठाकरेंनी शिंदेंची पुरती उतरवली

जेव्हा शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे तमाम 'हिंदू बांधवांनो' म्हणायचे, तसे आता उद्धव ठाकरे का म्हणत नाहीत. याबद्दल त्यांना कोणी विचारलं आहे का? त्यांनी आपलं हिंदुत्व सोडलं आहे का? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, असे म्हणत प्रतापराव जाधव ठाकरेंवर निशाना साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com