Ravi Rana Vs Arvind Sawant : रवी राणांच्या पोटातील विष ओठांवर आलं, 'लाडकं' सोंग उघडं पडलं; अरविंद सावंत भडकले

Arvind Sawant criticism of Ravi Rana : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत शिर्डी इथं साईसमाधीचं दर्शन घेतल्यानंतर आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली. महायुती सरकारची योजना ही निवडणुकीपुरतं सोंग आहे, असे देखील म्हटले.
Ravi Rana Vs Arvind Sawant
Ravi Rana Vs Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : आमदार रवी राणा यांच्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत चांगलेच भडकले. "रवी राणा जे काही बोलले, हे त्यांच्या पोटातील विष होते. ते ओठांवर आले. महाराष्ट्र याची नक्कीच दखल घेईल. मध्य प्रदेशामधील लाडक्या बहीण योजनेचे पुढं काय झाले, याची माहिती घ्या. निवडणुकीपुरते हे सोंग आहे", असा देखील टोला खासदार अरविंद सावंत यांनी महायुती सरकारला लावला.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत शिर्डीत होते. शिर्डीत साईसमाधीचं दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत, रवी राणा यांच्या विधानाचा आणि महायुती सरकार राबवत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. रवी राणा यांच्या विधानावर अरविंद सावंत चांगलेच संतापले होते.

Ravi Rana Vs Arvind Sawant
Nilesh Lanke Vs Shivsana : खासदार लंके, आमदार कानडेंना शिवसेनेच्या 'मशाली'ची धग? विधानसभेचं गणित बिघडवणार

"रवी राणा (Ravi Rana) यांच्या पोटातील विष आता ओठांवर आलं. महाराष्ट्राने याची दखल घेतली पाहिजे. मध्यप्रदेशमधील लाडक्या बहीण योजनेची काय स्थिती आहे, त्याची देखील माहिती घ्यावी. निवडणुकीपुरते हे सोंग आहे. या सोंगापासून सावध राहा. बहिणींनी मात्र पैसे घ्या, सोडू नका. मात्र महायुती सरकार किती लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देते, हे देखील पाहिले पाहिजे. जनतेचा पैसा आहे. सरकारचा नाही", याकडे देखील अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले.

Ravi Rana Vs Arvind Sawant
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : खेटाखेटी केली, आता न्यायालयात गेलात, पुन्हा दोन-तीन लाखांनी पाडत असतो; खासदार लंकेंचा विखेंना टोला

"सरकार मनात जे येत आहे, ते करत आहे. लाडक्या बहीण योजनेवर 46 हजार कोटी रुपये खर्च करत आहेत. कर्ज वाढत आहे. खरा वायदा १५ लाख रुपयांचा होता. प्रत्यक्षात पंधराशे देत आहेत. त्याला देखील अटी-नियमांमुळे कात्री लागत आहे. बहिणींना दिले दाजींचे काय? दाजींना सरकारने उपाशी ठेवले आहे", असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

"महायुती सरकार फक्त योजनेची घोषणा करत निवडणुकीला समोरे जात आहे. महाराष्ट्रात उद्योग वाढवण्यावर काहीच करत नाही. महाराष्ट्रातील महिंद्राचा मोठा प्रकल्प पुन्हा गुजरातला पळवला गेला. त्यावर सरकार काहीच बोलत नाही. बेरोजगारी दूर करण्यासाठी रोजगार न देणाऱ्या सरकारला जनेता या निवडणुकीत सत्तेपासून दूर करेल", असा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com