Bacchu Kadu Politics: बच्चू कडू यांनी आव्हान स्वीकारले, थेट गुलाबराव पाटील यांच्या घरीच जाणार!

Bachchu Kadu accepts Gulabrao Patil's challenge; will go to Gulabrao Patil's house, Shiv Sena and Kadu will have a bitter dispute-बच्चू कडू म्हणतात, मंत्री गुलाबराव पाटील यांचा शेतकरी पुत्र म्हणून आवाज दबला आहे, तो पुन्हा पाहण्याची इच्छा आहे.
Gulabrao-Patil-Bachhu-Kadu
Gulabrao-Patil-Bachhu-KaduSarkarnama
Published on
Updated on

Bacchon Kadu Vs Gulabrao Patil News: केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि कर्जमाफी या विषयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जळगाव शहरात आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले आहे.

माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा झाला. यामध्ये माजी आमदार बच्चू कडू यांसह विविध नेते सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी निवेदन घेण्यास आले नाही. त्यामुळे संतापलेले शेतकरी गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोंधळानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना आव्हान दिले होते. माजी आमदार कडू यांनी माझ्या गावात येऊन दाखवावे. त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही, असे आव्हान मंत्री पाटील यांनी दिले.

Gulabrao-Patil-Bachhu-Kadu
Deepak kesarkar Politics: दीपक केसरकर यांचा संजय राऊत यांना टोला, म्हणाले, खरी शिवसेना आमचीच, तुमची नाही!

त्या पाठोपाठ माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार कडू यांसह १३ नेत्यांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हे गुन्हे दाखल करण्यात पालकमंत्री पाटील यांचा राजकीय दबाव होता, असा आरोप कडू यांनी केला होता. आता हे राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे.

Gulabrao-Patil-Bachhu-Kadu
Tribal Birhad Morcha: धक्कादायक; सरकारी उदासीनतेचा बळी, आदिवासी बिऱ्हाड मोर्चातील युवकाने संपवले जीवन!

बच्चू कडू यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आव्हान स्वीकारत असल्याचे जाहीर केले. गुलाबराव पाटील शेतकरी पुत्र होते. विधीमंडळात त्यांचा आवाज शेतकऱ्यांसाठी आक्रमक होता. आता तो राहिलेला नाही.

सध्या मात्र गुलाबराव पाटील यांचा शेतकऱ्यांसाठी घुमणारा आवाज हरवला आहे. शेतकरी पुत्र म्हणून तुमचा आवाज आम्ही पाहिला तो आता दबला गेला आहे. तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो, असे कडू म्हणाले.

मंत्री पाटील यांचे आव्हान आपण स्वीकारले आहे. आम्ही ५ ऑक्टोबरला जळगावला येऊन आंदोलन करणार. मंत्री पाटील यांच्या घरी देखील जाणार. ते शेतकरी पुत्र म्हणून की सत्ता पुत्र म्हणून स्वागत करतात याची आम्हाला उत्सुकता आहे.

मंत्री पाटील हे आता राज्याचे मंत्री आहेत. एका गावाचे राहिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचे इच्छा जरूर पूर्ण करणार. ते म्हटले तर त्यांच्या घरी देखील जाणार, ते काय व्यवस्था करतात याची उत्सुकता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com