Bhaskar Bhagare : अजित पवार, देवेंद्र फडणवीस सगळेच केंद्रापुढे फेल? काय आहे विषय?

Farmers News : महाविकास आघाडीच्या खासदारांना पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध आंदोलनाचा विषय मिळाला. त्या सर्व हवेतच विरल्या. संदर्भहीन घोषणांमुळे शेतकरी आता हतबल झाल्याचे चित्र आहे.
Bhaskar Bhagare
Bhaskar BhagareSarkarnama
Published on
Updated on

Onion farmer's News : केंद्रातील सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कोंडी केली आहे. देशभर भाव कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड संतापाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कांदा निर्यात बंदी उठविल्याच्या अनेक घोषणा केंद्र सरकारने केल्या. त्या सर्व हवेतच विरल्या. संदर्भहीन घोषणांमुळे शेतकरी आता हतबल झाल्याचे चित्र आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती. अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा विविध भाजपच्या नेत्यांनीही केली होती. माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही याच विषयावर पत्र लिहावे लागले. मात्र या सर्वच नेत्यांच्या पत्रांना केंद्र सरकारने केराची टोपली दाखवली असे चित्र आहे.

केंद्रातील भाजप सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण ठरली आहे. त्यामुळे या विषयावर शेतकऱ्यांना आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांची चांगलीच अडचण होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकार निर्यात बंदी मागे घेण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांचे रोज कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे.

Bhaskar Bhagare
IAS Priya Rani : अनेक वेळा अपयश येऊनही पूर्ण केलं आयएएस होण्याचं स्वप्न; वाचा, प्रिया राणीची गोष्ट

या प्रश्नावर आता महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांना आंदोलनाची संधी मिळाली आहे. या संदर्भात दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्रशासनाला थेट इशारा दिला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर, संसदेत महाविकास आघाडीचे सर्व खासदार कांद्याच्या माळा घालून सहभागी होतील. त्यानंतर संसदेच्या आवारातच शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाशिक सह राज्यातील विविध भागात रोज कोट्यावधी रुपयांची झळ सोसावी लागत आहे. कांद्याचे दर सातत्याने गडगडत आहेत दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेजारच्या देशांना कांदा निर्यातीची संधी मिळाली आहे. केंद्र शासनाने आपल्याच शेतकऱ्यांना निर्यात बंदी लादून भारतीय कांद्याची बाजारपेठ असलेल्या आखाती देशांमध्ये पाकिस्तान व अन्य देशांना पाय रोवण्यास संधी मिळेल अशी, परिस्थिती निर्माण केली आहे.

Bhaskar Bhagare
Nagpur Zilla Parishad News : काँग्रेसच्या ठरावाला भाजपचेही समर्थन; नागपूर जिल्हा परिषदेला हवी मुदतवाढ

या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत विविध घोषणा केल्या होत्या. मात्र या सर्व घोषणा आता हवेतच विरल्या आहेत. केंद्रातील भाजप सरकार स्वपक्षाबरोबरच महायुतीतील नेत्यांनाही जुमानत नसल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com