
Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत जीआर काढल्याने ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ अॅक्शन मोडवर असून न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला होता.
दरम्यान या सगळ्या घडामोडीवर विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ नाराज नसल्याचं म्हटलं आहे. ते रायगडमध्ये माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, मंत्री भुजबळांशी माझी यासंदर्भात चर्चा झाली आहे. मी त्यांना अश्वस्त केले आहे. ते नाराज नाहीत. छगन भुजबळ यांच्या मनात जो काही संभ्रम आहे तो दूर करु, ओबीसी समाजावर जीआरमुळे कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
फडणवीस पुढे म्हणाले, काढलेला जीआर हा सरसकट आरक्षणाचा नाही. काहीजण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहे. या जीआरचा ओबीसींवर काही परिणाम होणार नाही. हा पुराव्याचाच जीआर आहे. फक्त मराठवाड्यात इंग्रजांचे राज्य नव्हते तर निजामाचं राज्य होतं. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे इतर ठिकाणी मिळतात ते मराठवाड्यात मिळत नाही. मराठवाड्यातील पुरावे निजाम म्हणजेच हैदराबाद गॅझेरियरमध्ये मिळतात. त्यामुळे तिथले आपण ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. यातून एक प्रकारे खरे हक्कदार आहे त्यांना लाभ होईल. पण कुणालाही खोटेपणा करता येणार नाही. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी या जीआरचे स्वागत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अनेक ओबीसींनी आमच्या मनात शंका नाही असं सांगितलं आहे. भुजबळ साहेबांच्या मनातील शंका देखील आम्ही दूर करु, इतरांच्याही मनात शंका असेल तर तीही दूर करु. एक गोष्ट ओबीसी नेत्यांनाही माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत त्यांच्यावर अन्याय होऊ शकत नाही तसेच तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्याचं मराठ्यांना तर ओबीसींच ओबीसींना देणार आणि ज्यांचा खरा अधिकार आहे त्यांना ते ते देणार. दोन समाजाला कधीच एकमेकांसमोर आणणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे आभार मानले. अनेकवेळा समजुती-गैरसमजुती होतात. काहीजण जाणीवपूर्वक गैरसमजूती तयार करतात. पण आम्ही जे राजकारण शिकलो त्यात सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे आम्ही शिकलो. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे आमचे ब्रीदवाक्य आहे, असं फडणवीस म्हणाले. कुणावरच अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे,तीच पुढे राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.