Girish Mahajan : अखेर गिरीश महाजनांना त्र्यंबकच्या शेतकऱ्यांसाठी वेळ मिळाला... आले, भेटले पण पुन्हा येईन सांगून परतही गेले!

Girish Mahajan Nashik visit : त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या शंभर मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास एकतर्फी मनाई करण्यात आली आहे. 15 किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांची घरे आणि बांधकामे पाडण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले होते.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela Farmers' News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्रंबकेश्वर रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची घरे पाडली. 'एनएमआरडीए' ने केलेल्या या कारवाईमुळे शेतकरी रस्त्यावर उतरले. यासंदर्भात शासनाच्या कारवाई विरोधात वातावरण तापले आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या शंभर मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास एकतर्फी मनाई करण्यात आली आहे. 15 किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांची घरे आणि बांधकामे पाडण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले होते.

'एनएमआरडीए'च्या कारवाई विरोधात कैलास खांडबहाले यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या भागातील शेतकऱ्यांमध्ये पाडकाम केल्याने प्रचंड रोष आहे. त्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, ॲड तानाजी जायभावे, प्रभाकर खरोटे आदींसह विविध नेत्यांनी याबाबत शासनाविरुद्ध जनजागृती केली. शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळाने बारा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा देत कारवाई थांबविण्याचे तोंडी आदेश दिले होते.

Girish Mahajan
Govt Job : मुंबई हायकोर्टात मोठी भरती! एवढा जबरदस्त पगार ऐकून तुम्हीही अर्ज कराल!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना येत्या दोन दिवसात घटनास्थळी पाहणीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र कुंभमेळा मंत्री महाजन शेतकऱ्यांच्या भेटीला आलेच नाही. शेतकरी आणि आमदारांनी सातत्याने संपर्क करू नये प्रतिसाद मिळत नव्हता. कुंभमेळा मंत्री महाजन शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी आले नाही. दहा दिवस प्रतीक्षा करू नये शासनाचा प्रतिसाद नव्हता. या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.

दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राजकीय दौऱ्यावर आलेले महाजन सोमवारी शेतकऱ्यांना भेटले. मात्र कोणतेही ठोस आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले नाही. महाजन दोन दिवसांनी पुन्हा दौरा करून पाहणी करण्याचे आश्वासन देऊन परतले. शेतकऱ्यांची पाडण्यात आलेली बांधकामे आणि घरे यांचा पंचनामा करण्यात येईल. शासकीय नियमानुसार भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल. त्याबाबत संबंधित यंत्रणा कार्यवाही करतील, एवढाच काय तो दिलासा महाजन यांच्याकडून शेतकऱ्यांना मिळाला.

Girish Mahajan
Maharashtra Election commission : अखेर आयोगाने दुबार मतदारांची कुंडली शोधली : आता थेट घरोघरीच धडकणार!

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांना दोन दिवसांनी येतो असे आश्वासन देऊन गेले. मात्र घरे, बांधकामे आणि सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांचा जीव अद्यापही टांगणीला लागलेला आहे. गेल्यावेळी दोन दिवस सांगून दहा दिवसांनी महाजन आले. आता पुन्हा केव्हा येतात याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com