Manikrao Kokate : कर्जमाफी मिळणार का? शेतकऱ्याच्या प्रश्नावर कृषीमंत्री संतापले, म्हणाले, "त्या पैशातून साखरपुडे, लग्न..."

Manikrao Kokate farmers statement : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. कृषीमंत्री असतानाही त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 05 Apr : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. 1995 साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली आहे. या प्रकरणामुळे त्यांचं मंत्रीपद जाणार की काय? अशा चर्चा सुरू होत्या. तर कृषीमंत्री असतानाही माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. हल्‍ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही.

Manikrao Kokate
Maharashtra Government: तब्बल 21 वर्षांनंतर मिळाला न्याय! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारचा मोठा निर्णय

आम्‍ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांची ही वक्तव्य चर्चेत असतानाच आता त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? असा सवाल केला आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. एकीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

कारण, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार असल्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता कर्जमाफी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अजितदादांच्या याच वक्तव्यावरून नाशिकमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषीमंत्र्यांना एका शेतकऱ्याने, 'अजितदादा म्हणाले कर्जमाफी होणार नाही, पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? असा प्रश्न विचारला.

Manikrao Kokate
Dhairyasheel Mohite Patil: शहाजीबापूंनी भरसभेत थोबाडीत मारून घेतले, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मीठ चोळले, म्हणाले, 'एक लाख 24 हजार...'

त्यावर कृषीमंत्र्यांनी थेट या शेतकऱ्यालाच सुनावलं आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कोकाटे म्हणाले, जे नियमितपणे कर्ज भरतायत त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघायची. तोपर्यंत काही भरायचं नाही. समोर मीडिया उभी असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता?

त्या पैशांची शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? असा उलट प्रश्न त्यांनी शेतकऱ्याला केला. शिवाय, सरकार तुम्हाला शेतीत गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. ते पाईपलाईन, सिंचन आणि शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. अशी गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असंही मंत्री कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com