

केंद्र शासनाने केलेल्या वक्फ बोर्ड कायद्याच्या दुरुस्तीविरोधात जळगाव शहरात नागरिकांनी मोठं आंदोलन केलं.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याने सहभाग घेत केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शविला.
मुस्लिम समाजाने वक्फ बोर्डातील दुरुस्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
Jalgaon News : केंद्र शासनाने प्रचलित वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती केली. या दुरुस्तीला अल्पसंख्यांक समाजाचा विरोध अद्यापही मावळलेला नाही. जळगाव शहरात त्यासाठी मोठी निदर्शने झाली.
देशातील मुस्लिम समाजाच्या मालमत्ता आणि धार्मिक संस्था याबाबत वक्फ बोर्ड नियंत्रण करते. शासनामार्फत त्याचे काम चालते. भाजप आणि त्याच्याशी संबंधित संस्थांनी त्या विरोधात संसदेत दुरुस्ती केली. या दुरुस्तीला विरोध म्हणून जळगाव शहरातील मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. यावेळी जेल भरो आंदोलन करण्यात आले. त्यात हजारो नागरिकांनी स्वतःला अटक करून घेतली.
वक्फ सुधारणा कायदा 2025 तात्काळ रद्द करण्याची मागणी वक्फ बचाव समितीचे अध्यक्ष मुफ्ती खालील यांनी केली. केंद्र सरकारने केलेला कायदा भारतीय संविधान कलम 25, 26, 29 आणि 30 अंतर्गत नागरिकांना दिलेली धार्मिक स्वातंत्र्य याचे उल्लंघन आहे. अल्पसंख्यांक हक्कांचे त्यामुळे उल्लंघन झाले आहे, असे मुफ्ती खालील यांनी सांगितले.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनीही मागण्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी आंदोलनात सहभागी होऊन मावळ यांना पाठिंबा दिला. केंद्र शासनाने केलेली चूक तातडीने सुधारावे अशी मागणी त्यांनी केली.
श्रीमती शिंदे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा धर्मनीरपेक्ष पक्ष आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या हिताचे रक्षण सरकारने केले पाहिजे. वक्फ कायद्यातील तरतुदींना सुरुवातीपासून माझा पाठिंबा आहे. त्यामुळेच या आंदोलनात रस्त्यावर उतरून सक्रिय झाले, असे त्यांनी सांगितले.
बहुजन क्रांती मोर्चा नेत्या सुमित्रा अहिरे वंचित आघाडीच्या शमीभा पाटील, हाफिज कासिम मौलाना, ओसामा डॉक्टर, जावीद हाफिज यांसह विविध नेत्यांनी यावेळी लोकांना संबोधित केले. विशेष म्हणजे महायुतीचा मोठा भाऊ म्हणून भाजप आहे. सरकारचे सर्व निर्णय घेण्यात भाजपची मुख्य भूमिका असते. मात्र महायुतीतील घटक पक्ष त्यांच्या सर्वच धोरणांना पाठिंबा देतात, असे नाही. याची प्रचिती जळगाव शहरातील आंदोलनातून आली.
1. जळगावात कोणत्या कारणामुळे आंदोलन झाले?
केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या कायद्यात केलेल्या दुरुस्तीविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
2. आंदोलनात कोणत्या पक्षाच्या नेत्या सहभागी झाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रतिभा शिंदे आंदोलनात सहभागी झाल्या.
3. मुस्लिम समाजाची मुख्य मागणी काय आहे?
वक्फ बोर्डातील दुरुस्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे.
4. हे आंदोलन कोणत्या ठिकाणी झाले?
हे आंदोलन जळगाव शहरात झाले.
5. महायुतीतील पक्ष नेत्या केंद्र सरकारच्या विरोधात का उतरल्या?
कारण त्यांना वक्फ बोर्डाच्या दुरुस्तीबाबत असहमती असून, त्यांनी सुधारणा मागितली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.