Onion Rate Issue : कांद्यावरून राजकारण तापलं; 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते कांद्याच्या माळा घालून झोपले रस्त्यावर

Swabhimani Shetkari Sanghatana: 'स्वाभिमानी'चे राहुरीत रास्तारोको आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari SanghatanaSarkarnama

Ahmednagar News: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटेच्यावतीने अहमदनगरमधील राहुरीत नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत काहीसी झटापट झाली, त्यानंतर 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Swabhimani Shetkari Sanghatana
Onion Rate Issue: राज्यात कांद्याचा प्रश्न पेटला : केंद्राने जाहीर केलेला भाव मिळेना; शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

राहुरीच्या बाजार समिती समोरच नगर-मनमाड महामार्गावर 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी मोठ्या संख्येने रास्तारोको आंदोलन करत थेट रस्त्यावर उतरले. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्तारोको करण्यात आला.

"केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेला 40 टक्के निर्यात कर मागे घ्यावा, हिवाळी अधिवेशनात घोषित केलेले कांद्यावरील 350 रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे आणि कांद्याला किमान तीस ते चाळीस रुपये भाव द्यावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीच्या नेत्यांनी आक्रमक भाषणे करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari Sanghatana: कांद्याच्या निर्यातीवरील शुल्कावरून 'स्वाभिमानी' आक्रमक; राहुरीत शुक्रवारी करणार 'चक्काजाम'

याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधत सरकारला इशारा दिला. या आंदोलनात बोलताना रवींद्र मोरे यांनी सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असल्याचे सांगितले.

निर्यात कर रद्द केला तर कांद्याला चांगला भाव मिळणार आहे. पण सातत्याने केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण घेत असून स्वाभिमानी या धोरणांविरोधात आक्रमकपणे आंदोलने करेल, असा इशाराही मोरे यांनी दिला.

Swabhimani Shetkari Sanghatana
Shirdi Politics : आठवलेंनी शिर्डीवर दावा करताच लोखंडेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'राखीव माणसाची धोपटी सोबतच असते..'

"केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव पडल्याने कवडीमोल किंमतीने शेतकऱ्यांने कांदा विकला, अतिवृष्टीमुळे कांदा सडून नुकसान झाले, विविध कारणांनी कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात गेला. मात्र, तरीही सरकारने मदत केली नाही. आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळत असताना निर्यात कर लावण्याचा अधिकार सरकारला नाही.

सरकारने जनतेला फुकट कांदा वाटावा, पण शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव द्यावा, अन्यथा आम्ही सरकारच्या छाताडावर बसून भाव घेऊ. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अजून तीव्र करू", असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही दिला होता.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com