Vidharbh Politics : सलील देशमुखांना भलताच कॉन्फिडन्स; ‘दोनच महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार येणार’

Salil Deshmukh News : कामगार कल्याण महामंडळ हे राज्य सरकारचे आहे. भाजपची खासगी मालमत्ता नाही. राज्यातील सर्वच कामगारांना त्याचा लाभ मिळला पाहिजे. भाजपचे राज्य आता संपुष्टात येणार आहे.
Salil Deshmukh
Salil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 03 October : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र, नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख सध्या चांगलेच ॲक्टिव्ह आणि आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी मोर्चा काढून भाजप नेत्यांवर छोट्या बुद्धीचे आणि कटकारस्थानी असल्याचा आरोप केला. या वेळी त्यांनी दोन महिन्यांनी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सांगून सर्व कामगारांना न्याय देण्यात येईल, असाही दावा केला.

नागपूर शहरात असंघटित व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मतदारसंघात अलीकडेच कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले.

कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी साहित्य वाटप करताना भेदभाव करतात. महाविकास आघाडीचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये कीट वाटप करीत नाही. शिबिरे घेत नाहीत, असा सलील देशमुख (Salil Deshmukh) यांचा आरोप आहे.

Salil Deshmukh
Abhijeet Patil : बबनदादांना ‘विठ्ठल’ची बॅलन्सशीट तपासण्याचा अधिकार नाही; अभिजीत पाटलांनी खडसावले

अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड मतदारसंघात कीट वाटप करण्यात यावे, याकरिता आतापर्यंत कामगार कल्याण मंडळाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. निवेदने देण्यात आली. मात्र, अद्यापही कामगारांना कीट वाटप करण्यात आली नसल्याने सलील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सलील देशमुख यांच्या नेतृत्वात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.

देशमुख म्हणाले, राज्यात आघाडीचे सरकार असताना शरद पवार यांच्या पुढाकारने असंघटित कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. हसन मुश्रीफ यांच्याकडे या खात्याचे मंत्रिपद देण्यात आले होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी फक्त आपल्याच मतदारसंघातील कामगारांना लाभ देणे सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.

Salil Deshmukh
Prashant Paricharak : तुतारीचा आग्रह धरणाऱ्या समर्थकांचा परिचारकांच्या भाजप उमेदवारीसाठी निरीक्षकांपुढे आटापिटा

कामगार कल्याण महामंडळ हे राज्य सरकारचे आहे. भाजपची खासगी मालमत्ता नाही. राज्यातील सर्वच कामगारांना त्याचा लाभ मिळला पाहिजे. भाजपचे राज्य आता संपुष्टात येणार आहे. फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर आमचेच सरकार येणार आहे, असेही सलील देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com