
Mahayuti Politics : विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 10 आमदार विजयी झाले. अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे.
योगेश कदम म्हणाले, 'विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर 40 ते 42 सदस्य आहेत. मात्र,महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या 20 पर्यंत खाली येऊ शकते. कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो.अजितदादांच्या आणि शरद पवारसाहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत.'
'महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत. त्यांच्या लक्ष्यात आले आहे की पुढील पंधरा वर्ष आता महायुती काही हालत नाही. त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. ', असे कदम यांनी सांगितले.
रत्नागिरीच्या पालकमंत्रिपदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनीअर आहेत. माझ्या करता ते मोठे भाऊ आहेत. त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्रीपद हे उदय सामंत यांना द्यावं. आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.