Abhijit Bichukale : कल्याण मतदारसंघात 80 हजार मतदारांची नावं गायब? ; अभिजीत बिचुकलेंनी केली फेर निवडणुकीची मागणी!

Kalyan Constituency : अन्यथा 27 मे पासून आमरण उपोषण करण्याचा निवडणूक आयोगाला इशारा
Abhijit Bichukale
Abhijit BichukaleSarkarnama

Loksabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदार संघाकरीता सोमवारी मतदान पार पडले. या मतदार संघातून तब्बल 80 हजार मतदारांची नावे गायब झाली आहेत. त्यामुळे 80 हजार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. ते मतदानापासून वंचित राहिले आहेत.

परिणामी या लाेकसभा मतदार संघात फेर निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी बिग बॉस फेम आणि कल्याण लोकसभेतील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले(Abhijit Bichukale) यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांची मागणी विचारात घेतली नाही तर येत्या २७ मे पासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा बिचुकुले यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijit Bichukale
Gajanan Kirtikar News : दीड वर्षांपूर्वी शिंदे गटात गेलो पण आता एकटा पडलो; गजानन कीर्तीकर नेमके काय म्हणाले?

अपक्ष उमेदवार बिचुकले यांनी मंगळवारी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सातपुते यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदनही बिचुकले यांनी सादर केले आहे. बिचुकले यांनी म्हटले की, 'कल्याण लोकसभा मतदार संघात कमी टक्के मतदान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कल्याण लोकसभा मतदार संघात मतदान सुरु होते, त्यावेळी त्याठिकाणी निवडणूक प्रक्रियेतही गडबड सुरु आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद पाहिली तर त्याठिकाणी त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचे काम थोडेसे मनमानी कारभाराचे आहे.'

तसेच 'मी कल्याण लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार असल्याने या प्रकरणी मी जातीने लक्ष घालून, निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले. तर या मतदार संघात 80 हजार नावे लुप्त केली असतील आणि एका माणसाचे नाव जरी झाले तरी लोकहिताला बाधा येते. हे कामकाज सरकारच्या माध्यमातून प्रेरित आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.'

Abhijit Bichukale
Chief Minister Eknath Shinde News : ठाकरे-फडणवीसांची जुगलबंदी, मुख्यमंत्री शिंदेंचा चौकशीचा आदेश...

याशिवाय, मतदानापासून लोकांना तूम्ही वंचित ठेवत असाल तर संपूर्णत: मी प्रथम भारतीय आहे. शेवटही मी भारतीयच आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांचा अधिकार लूप्त केला. त्यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणूक पुन्हा घ्या. अन्यथा 27 मे रोजी अपक्ष उमेदवार आणि ज्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यांच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बिचुकले यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com