Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीत दाखल; अमित शाहांबरोबर रात्री बैठक!

Both DCM too In Delhi : नीती आयोगाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांची एकत्रित बैठक दिल्लीत होणार आहे. विशेषतः आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या तीनही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Mahayuti Leader
Mahayuti LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 27 July : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांच्यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील नीती आयोगाची पहिलीच बैठक आज होत आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शुक्रवारी (ता. 26 जुलै) रात्रीच दिल्लीत दाखल झाले आहेत. ते नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले आहेत. या नीती आयोगाच्या बैठकीबरोबरच दिल्लीत इतर राजकीय बैठकाही आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. नीती आयोगाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची भेट होणार आहे. त्यानंतर त्यांची एकत्रित बैठक दिल्लीत होणार आहे. विशेषतः आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे या तीनही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mahayuti Leader
Mangalvedha Politics : ‘अहो ताई...किती करताय घाई’?: लोकसभेतील ‘मंगळवेढा उपसा’च्या प्रश्नावरून आवताडे समर्थकांचा प्रणिती शिंदेंना सवाल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जागा वाटपाच्या मुद्यावर बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत महायुतीमधील तीनही पक्षाच्या वाट्याला किती जागा येतील आणि कोण कोठच्या जागा लढविणार, याबाबत प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप 160, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडूनही शंभरपेक्षा जास्त जागांची मागणी केलेली आहे. महायुतीमधील तिसरा भिडू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मात्र पहिल्यापासूनच 80 जागांवर दावा केलेला आहे. आम्हाला किमान 80 जागा मिळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

Mahayuti Leader
Assembly Election : राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे टेन्शन; धुळ्यातील साक्री, शिरपूर मतदारसंघावर ठोकला दावा

माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मात्र भारतीय जनता पक्षाने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढावी. भाजपने 288 जागांवर उमेदवार उभे केले पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे, त्यामुळे भाजप किती जागा लढवणार आणि मित्रपक्षाला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com