Thackeray Group News: कायंदे, गोऱ्हेंपाठोपाठ आता मुंबई महापालिकेतील 'या' बड्या महिला नेत्याचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

Shivsena Political News : '' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत...''
Uddhav Thackeray - Eknath Shinde
Uddhav Thackeray - Eknath Shinde Sarkarnama

Mumbai : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आत्तापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले आहेत. शिंदेंनी गेल्या वर्षभराच्या काळात मोठमोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणले आहेत. काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील उध्दव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. आता आणखी एक बड्या महिला नेत्यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे.

मुंबई महानगरपालिके(BMC)तील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विश्वासराव या माजी सभागृह नेत्या आणि सातवेळा नगरसेविका राहिल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तृष्णा विश्वासराव यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरेंसाठी धक्का मानला आहे.

Uddhav Thackeray - Eknath Shinde
Aditya Thackeray on BMC : मुंबई लुटण्यासाठी भाजप प्रयत्न सुरूच आहेत: आदित्य ठाकरेंचा पुन्हा घणाघात

तृष्णा विश्वासराव यांच्या काय म्हणाले..?

शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या तृष्णा विश्वासराव म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने शिवसेने(Shivsena)त प्रवेश केला. आता शिवसेना पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करू असेही म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तृष्णा विश्वासराव यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा यावेळी केली. शिंदे म्हणाले, सभागृहनेत्या, विभाग प्रमुख, संपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. वर्षभरापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला त्यामध्ये लोकांचे हित होते. जे निर्णय घेतले ते हिताचे होते. आमच्या निर्णयाला लाखो लोकांनी पाठिंबा दिला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray - Eknath Shinde
Maharashtra Monsoon Session: राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांची अधिवेशनाच्या कामकाजास टाळाटाळ; अद्यापही संभ्रम?

शिंदे नेमकं काय म्हणाले...?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार कोणासाठी असते? सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असते. त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी सरकार असले पाहिजे. कायदे, नियम बदलणारे सरकार असले पाहिजे. ते काम आम्ही करतोय म्हणून अल्पकाळात हे सरकार लोकांचे सरकार झाले. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जी धाडसी भूमिका घेतली त्याला हजारो, लाखो लोकांनी समर्थन दिलं असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com