राऊतांना 'नॉटी नामर्द' म्हणण्यामागील कारण अमृता फडणवीसांनीच अखेर केलं उघड

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांचा उल्लेख नॉटी नामर्द, असा केला होता.
Sanjay Raut and Amruta Fadnavis
Sanjay Raut and Amruta FadnavisSarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल ट्विट केले होते. त्यांनी राऊतांचा उल्लेख नॉटी नामर्द, असा केला होता. अखेर त्यांनी यामागील कारण उघड केले आहे. फडणवीस यांची पत्नी म्हणून नव्हे तर सामान्य स्त्री म्हणून ट्विट करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीसांनी यांनी संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाक्ष्यक्ष नाना पटोले यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला होता. यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यांनी राऊतांचा उल्लेख नॉटी नामर्द असा तर मलिकांना बिगडे नवाब असे म्हटले होते. पटोलेंचा उल्लेख त्यांनी नन्हे पटोले असा केला होता.

या ट्विटनंतर सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने पातळी सोडून अशी ट्विट करू नयेत, असे प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. आता राऊतांचा नॉटी नामर्द उल्लेख करण्यामागील कारण अमृता फडणवीस यांनी उघड केले आहे. त्या म्हणाल्या की, राऊतांना लोकांनीच ही उपाधी दिलेली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक चुकीची पोस्ट टाकली होती. तेव्हा एका महिला नेत्यानेही राऊतांचा असाच उल्लेख केला. तेच मी उचलून ट्विटमध्ये टाकले होते. त्यातील नामर्द शब्दाचा तंतोतंत अर्थ घेऊ नये. नामर्द म्हणजे तुम्ही समोरुन न वार करता पाठीमागून वार करणारा असतो.

Sanjay Raut and Amruta Fadnavis
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे होताहेत घटस्फोट! अमृता फडणवीसांचा दावा

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरोगामी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे पुरोगामी आहेत. भाजप आणि संघाकडून स्त्रियांचा मान ठेवला जातो. मी अराजकीय व्यक्ती आहे पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. स्त्रियांना सर्वाधिक आदर देणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे, असेही फडणवीस म्हणाल्या.

Sanjay Raut and Amruta Fadnavis
मोठी बातमी : नितेश राणेंना न्यायालयाचा दिलासा

बंडातात्यांनाही सुनावले

बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, स्त्रियांनी आधीच आपल्या देशात खूप भोगले आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणे आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणे चुकीचे आहे. त्यापासून दूर राहायला हवे. आपल्या देशात नेहमी हेच घडत आले आहे. कुणी काही बोलले की त्यावर आपण आंदोलन करतो. खरे तर या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. काय बोलावे आणि काय बोलू नये, हे आपणच ठरवावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com