Sharad Pawar News : भालके 'बीआरएस'च्या वाटेवर; शरद पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला

BRS and Bhagirath Bhalke : 'बीआरएस'च्या शेतकरी मुद्द्यावरही पवारांची टीका
Bhagirath Bhalke, Sharad Pawar
Bhagirath Bhalke, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar on Bhagirath Bhalke : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरमधील नेते भगीरथ भालके भारत राष्ट्र समिती (बीआरएस)च्या वाटेवर आहेत. त्यांच्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी खास विमान पाठवले. त्यातून ते भालके हैदराबादला राव यांच्या भेटीसाठी गेले आहेत. भालके 'बीआरएस'मध्ये गेले तर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जास्त बोलणे टाळले आहे.

Bhagirath Bhalke, Sharad Pawar
Ajit Pawar News : कोल्हापुरातील राड्यानंतर अजित पवारांचा खळबळजनक विधान; '' निवडणुका समोर ठेवून राज्यात दंगली...''

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली होती.

दरम्यान, बुधवारी (ता. ७) भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) चार्टर्ड विमानाने हैदराबादला रवाना झाले आहेत. ते २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.

Bhagirath Bhalke, Sharad Pawar
Ahmednagar Politics: नगर जिल्ह्यात तणाव का वाढतोय? खासदार सुजय विखेंनी सांगितलं 'हे' कारण

भालके यांच्या भूमिकेबाबत शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. भालके 'बीआरएस'च्या वाटेवर आहेत, याबाबत विचारले असता पवारांनी जास्त बोलणे टाळले. पवार म्हणाले, "कोण पक्ष सोडून जातायत त्यांच्याबाबत आढावा घेतला. त्यात संबंधितांनी पक्ष सोडल्यानंतर फारशी चिंता करण्याची गरज आहे असे वाटत नाही." यानंतर त्यांनी 'बीआरएस'च्या (BRS) शेतकरी मुद्द्याचाही समाचार घेतला.

Bhagirath Bhalke, Sharad Pawar
NCP News : राष्ट्रवादीत भाकरी फिरवली, प्रदेश प्रवक्ते भडकले; शहराध्यक्ष म्हणतात देशमुखांच्या सांगण्यावरून केले !

राज्यात 'बीआरएस' कुठल्याही पक्षावर टीका करत नाही. ते फक्त शेतकरी मुद्द्यांवर बोलतात. याबाबत पवार म्हणाले, "आता ते सांगतात आणि त्यांचे म्हणणे लोकांना पटत असेल तर पटू द्या. त्यासाठी वर्ष-सहा महिने जावे लागतात. त्यानंतर खरी स्थिती समोर येते. अनुभव घेतल्यानंतर लोक नक्कीच निष्कर्षापर्यंत येतील. आज ज्या पद्धतीने वाटप सुरू केले आहे, त्याचा फायदा नक्की किती? त्याचा राज्याच्या अर्थकारणावर किती परिणाम होणार? दर्जात्मक विकासावर काय परिणाम होणार? सरकारकडे असलेला पैसा विकासाला द्यायचा की वाटपाला घालवायचा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com