Suresh Mhatre Vs Kapil Patil: निकालाआधीच भिवंडीत राजकारण तापलं, बाळ्यामामांचा कपिल पाटलांवर गंभीर आरोप; 'मनोज म्हात्रे हत्येत...'

Suresh Mhatre On Kapil Patil: मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात अटक असलेल्या आरोपीचा हत्याकांडानंतर सुमित पाटील यांच्याशी सतत संपर्क सुरु होता. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे आतापर्यंत कपिल पाटील बचावल्याचा दावा बाळ्यामामा यांनी केला आहे.
Manoj Mhatre, Kapil Patil And Suresh Mhatre
Manoj Mhatre, Kapil Patil And Suresh MhatreSarkarnama

Suresh Mhatre On Kapil Patil: राज्यातील लोकसभेसाठीचं पाचही टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. त्यामुळे आता मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली राजकीय नेत्यांची धावपळ काहीशी थांबली आहे. परंतु, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं नेतेमंडळींनी अद्याप बंद केलं नसल्याचं दिसत आहे.

अशातच आता भिवंडीतील काँग्रेस (Congress) नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय मंत्री कपिल पाटील व त्यांचा पुतण्या सुमित पाटील यांचा हात होता, असा खळबळजनक आरोप भिवंडी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा (Suresh Mhatre) यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळ्यामामा यांच्या आरोपामुळे आता पुन्हा मनोज म्हात्रे (Manoj Mhatre) हत्या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात अटक असलेल्या आरोपीचा हत्याकांडानंतर सुमित पाटील यांच्याशी सतत संपर्क सुरु होता, मात्र राजकीय वरदहस्तामुळे आतापर्यंत कपिल पाटील बचावले असल्याचा दावा देखील बाळ्यामामा यांनी केला आहे.

भिवंडीतील पद्मानगर परिसरातील कार्यकर्त्यांनी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत महाविकास आघाडीला मदत न केल्याचा राग मनात धरून पद्मानगर येथील श्रीनिवास नडीगोट्टू उर्फ स्वामी याला भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. जखमी स्वामीला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच जखमी स्वामीची बाळ्यामामा यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी कपिल पाटील व त्यांच्या कार्यकर्त्याचा निषेध करत राजकारणात अशा प्रकारे चिडून कार्यकर्त्याना मारहाण करणं चुकीचं असल्याचं म्हटलं.

Manoj Mhatre, Kapil Patil And Suresh Mhatre
Eknath Shinde News : लोकसभेच्या निकालावर मुख्यमंत्र्यांचे मोठं भाकीत; 'महाराष्ट्रात आघाडी...'

तर यावेळी बाळ्यामामा यांनी मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांना 4 जूननंतर सर्व हत्याकांडाची प्रकरणे बाहेर काढू असा इशाराच दिला. ते म्हणाले, "कपिल पाटील यांनी दादागिरी थांबवावी. यापूर्वीदेखील त्यांनी माजी आमदार योगेश पाटलांच्या घरावर हल्ला केला. मनोज म्हात्रे प्रकरणातही त्यांचा हात होता, अनेक कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यातही त्यांचा हात होता. या सर्व प्रकरणाची पोलिस सखोल चौकशी करत असून आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाटील यांच्या दादागिरीची सर्व प्रकरणे आपण स्वतः पुराव्यानिशी बाहेर काढणार."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com