BMC Election : निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीसोबत आलेली मनसे आगामी स्थानिक स्वराज संस्था महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याची चर्चा सुरू झाली. मुंबई महापालिका देखील ते एकत्र लढतील, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसचे विधान परिषदेमधील आमदार भाई जगताप यांनी या चर्चांमधील हवा काढत 'राज ठाकरे सोडाच आम्ही उद्धव ठाकरेंसोबत लढणार नाही', अशी भूमिका मांडली. मी काँग्रेसचा मुंबईचा अध्यक्ष असताना ही भूमिका मांडली होती. आता देखील माझी तीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.
भाई जगताप यांच्या वक्तव्याबाबत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, आमच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाई जगताप यांनी देखील हे आपले वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.
भाई जगतापांच्या या भूमिकेवर मनसेने देखील सडेतोड उत्तर दिले. मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले,त्यांच्याकडे कोणी हात पसरला होता. त्यांच्या बोलणं त्यांना लखलाभ असो. त्यांच्याकडे आघाडीसाठी मनसेचे कोण नेता, पदाधिकारी गेलो होतो की राजसाहेब ठाकरेंनी याबाबत काही बोलले होते. त्यामुळे ते अशा प्रकारे बोलत आहे?'
भाई जगताप यांनी स्पष्ट केले की काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत न जाता स्वबळावर लढणावे हे आपले वैयक्तिक मत आहे.निवडणूक कोणासोबत लढायची याचा निर्णय हायकमांड घेत असते. तसेच वर्षा गायकवाड यांनी देखील हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.