
Mumbai, 01 September : मी स्वतः आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्रही (एकनाथ शिंदे आणि अजित पवार) होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे, गॅझेटरियन व इतर सर्व दफ्तर (ओबीसी आरक्षणाची कागदपत्रे) दाखवले आणि सांगितलं, ‘हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी पुढे जाल, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही न्यायालयात हजर असणार आहोत, असा खणखणीत इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज सकाळी घडलेली घडना पत्रकार परिषदेत सांगितली.
ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण (OBC Reservation) पाहिजे. मराठा समाजाला काय द्यायचे, याबाबत माझं काही म्हणणं नाही, त्यांना आरक्षण जरुर द्या. ते काय करतात, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. पण आमचं 27 टक्क्यांपैकी आता केवळ सतरा टक्के शिल्लक राहिलेलं आहे. कारण सहा टक्के आरक्षण हे भटक्या विमुक्त समाजासाठी गेलं आहे. दोन टक्के गोवारी समाजाला दिलं आहे. नोमेडिक व इतर देऊन आम्हा ओबीसींना केवळ सतरा टक्के शिल्लक राहिलं आहे आणि त्यात 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये (ओबीसी) त्यांना (मराठा समाज) टाकू नका. एवढीच आम्ही विनंती आहे.
मी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. त्यांना ओबीसी आरक्षणबाबत सर्व माहिती दिली आहे. ज्या दिवशी सरकार ओबीसींचे हक्क ओलांडून पुढे जाईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही न्यायालयात हजर असणार आहोत. आंदोलन तर करूच. पण, आम्ही दुसऱ्याच दिवशी कोर्टात जाणार आहोत, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तुम्ही मानत असाल तर ते ही सर्व कागदपत्रे संविधानातून निर्माण झालेली आहेत. ती सर्व कागदपत्रे तुम्हाला मान्य करावीच लागतील. त्याप्रमाणे तुम्हाला जे करायचं आहे ते करा. बाकी ते जे काय करतात, कोर्टात काय करतात, त्याबाबत आम्हाला काहीही कर्तव्य नाही.
मराठा आरक्षणाबाबत ते (मनोज जरांगे पाटील) आणि सरकार काय करायचं ते पाहून घेतील. आपण आता तयारीला लागायचं. अनेक ठिकाणी उपोषणे सुरू करायची आहेत. तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्या पातळीवर मोर्चे काढून आमच्या ओबीसीच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, पूर्वी फक्त 250 जाती होत्या, त्यात आता 374 झाल्या आहेत, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.