
Ahmednagar News : महाराष्ट्रातील औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' तर उस्मानाबादचे 'धाराशिव' नामांतर करण्यात आल्यानंतर अहमदनगरचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती.
केंद्रातील एनडीए सरकारने अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या नामांतरावर काही दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे नगरच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर आता राज्य सरकारकडून अहमदनगरचे 'अहिल्यानगर' असं नामांतराचा अध्यादेश काढण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील एनडीए आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारने धडाकेबाज निर्णयांचा धडाकाच लावला आहे. त्यातच आता गेले कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा आता निकाली काढण्यात आला आहे.
अहमदनगर हे यापुढे 'अहिल्यानगर' या नावानं आता ओळखले जाणार आहे. महायुती सरकारकडून बुधवारी संध्याकाळी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पुण्याश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी होत होती. अनेक वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनास 300 वर्ष पूर्ण होत असतानाच, हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चोंडी (ता.जामखेड) येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही नामांतराच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे विनंतीपत्र दिले होते. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर नावाला कोणतेही हरकत नसल्याचे राज्य आणि जिल्हा प्रशासनाला कळविले होते.
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावार शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याचं संपूर्ण श्रेय महायुतीने घेण्यास सुरुवात केली होती. त्यात भाजप आघाडीवर होतं. भाजप नेते आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निर्णयाचं स्वागत केलं होतं. परंतु अहमदनगरचे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे.
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावार शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याचं संपूर्ण श्रेय महायुतीने घेण्यास सुरवात केली आहे. यात भाजप आघाडीवर आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी निर्णयाचं पहिलं स्वागत केलं आहे. परंतु हा निर्णय वादात सापडण्याची चिन्हं आहे. राज्य सरकारने नामांतरचा निर्णय 13 मार्च रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होता होता. हा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठवला होता.अहमदनगरचे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे. यातच राज्यापाठोपाठ केंद्राने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली असून यावर सुनावणी सुरू आहेत. असतानाच केंद्राने नामांतराचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.