
Mumbai News : महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याचवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर हा महाशपथविधी सोहळा गुरुवारी (ता.5) संपन्न झाला. या सोहळ्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठी कबुली दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला.यानंतर त्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना ते मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.
फडणवीस म्हणाले, माझ्याकडे खूप अनुभव आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आपण अडीच वर्ष विरोधी पक्षनेता होतो,पण साडेसात वर्ष मी सरकारमध्ये होतो. मला सरकारचा अनुभवदेखील चांगला आहे.पण यावेळी ज्याप्रकारचं बहुमत आमच्या महायुतीला (Mahayuti) मिळालं आहे. मला असं वाटतं की, त्या बहुमताचं एक प्रेशर,लोकांच्या प्रेमाचं प्रेशर आमच्यावर आहे आणि तेच मी सध्या अनुभवतो आहे, अशी मोठी कबुलीच त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत दिली.
तसेच जेव्हा लोकांच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात, तेव्हा समोरची आव्हानंही तितकीच मोठी असतात. कारण लोकं तुमच्याकडून अपेक्षा करत असतात, त्यामुळे यावेळी त्याचं प्रेशर निश्चित मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर असणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
फडणवीस म्हणाले,आपला महाराष्ट्र वेगाने प्रगती करतो आहे.पण आपली राजकीय संस्कृती जी आहे, त्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. योग्य वातावरण कसं करता येईल, त्याचा प्रयत्न केला पाहिजे. शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार,उद्धव ठाकरे,राज ठाकरे,पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना आपण फोन करुन निमंत्रण दिले.ते आज येऊ शकले नाहीत पण त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आपल्याला असं वाटतं की, राजकीय संवाद कधी संपला नाही.इतर राज्यांमध्ये पाहिले असेल की, खून के प्यासे असतात.पण महाराष्ट्रात असं राहू नये असा माझा प्रयत्न असणार आहे. उद्धव ठाकरेंनी प्रचारादरम्यान केलेल्या एक तर तू राहीन किंवा मी या विधानासंबंधीच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले,आपण त्याहीवेळेस सांगितलं होतं. राजकारणात तेही राहतील,मीही राहीन, सगळेच राहतात, असं मोजक्यात वाक्यात उत्तर देत त्यांनी आपली पुढच्या राजकारणाची दिशाच स्पष्ट केली.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा वातावरण तापवलं आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मागच्या सरकारमध्ये केलं आणि आता ही करणार आहे.आपल्या साईबाबांचं वाक्य आहे श्रद्धा आणि सबुरी. तसं शपथ घेताना माझ्या मनात होतं.जातीय जणगणना जर केली तर लहान जातींवर अन्याय होऊ शकतो, त्यामुळे राजकीय याचा वापर नको.आम्ही बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा दिला होता, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.