Maharashtra Politics : CM फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का! शिंदे सरकारने घेतलेला 'तो' निर्णय केला रद्द

Devendra Fadnavis Cancels Eknath Shinde Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेला आणखी एक निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी शिंदेंना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.
Eknath Shinde, Devendra fadnavis
Eknath Shinde, Devendra fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 14 Oct : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेला आणखी एक निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी शिंदेंना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे सरकारच्या काळात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी मंत्रालयाजवळ उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता ती जागा देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला आहे. तर हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रालयाजवळ असलेल्या जीवन बिमा मार्ग येथे 909 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेपैकी 200 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून उर्वरीत जवळपास 700 चौरस फूटांटी जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती.

Eknath Shinde, Devendra fadnavis
Ravindra Dhangekar On BJP: चंद्रकांतदादा, मोहोळ 'टार्गेट'वर; तरीही धंगेकर म्हणतात,'भाजपच्या 'त्या' गटाचा मला पाठिंबा...'

मात्र, आता बिहारमधील निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारने प्रहार पक्षाला जागा देण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंविरोधात बंड करुन महायुतीसोबत जाणाऱ्या आणि एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांनाच आता फडणवीसांनी दणका दिल्याचं बोललं जात आहे.

Eknath Shinde, Devendra fadnavis
Nilesh Ghaywal : निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर, बनावट पासपोर्टनंतर आता दमदाटी करून दुसऱ्याचं सीम कार्ड घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

तर बच्चू कडू मागील काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला का? अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान फडणवीस सरकारच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, 'भाजपचं नेचर, गरज सरो आणि वैद्य मरो असं आहे. त्यांच्या विरोधात काय केलं की ते असे कारनामे करतात. ते कार्यालय आम्हाला दिलं होतं मात्र आता भाऊंनी पुन्हा मी किती राजकारणी आहे हे दाखवून दिलं', असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आम्ही कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com