Eknath Shinde : "दाढीनेच तुमची गाडी खड्ड्यात घातली", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. तेव्हा, ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केलं. याला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युतर दिलं आहे.
uddhav thackeray eknath shinde.jpg
uddhav thackeray eknath shinde.jpgsarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ठाण्यातील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाढीवरून फटकारे लगावले होते. "शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मिंधेंची दाढी उगवली. अन्यथा उगवली नसती," असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता.

याला मुख्यमंत्री शिंदे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "दाढीनं तुमची गाडी खड्ड्यात घातली," असा टोला मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शिवसेनेचा 'भगवा सप्ताह' समारोप ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. तेव्हा, ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केलं. "हे शिवसेनाप्रमुखांचे ठाणे आहे. त्यांचे ठाण्यावर अतोनात प्रेम होते. ठाकरेकरांनीही शिवसेनाप्रमुखांवर प्रेम केले. ही सगळी ठाकरेंची मेहनत आहे. ही मेहनत झाली नसती, तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.

यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "माझ्या दाढीची यांना धास्ती आहे. आनंद दिघे यांच्या दाढीची धास्ती सगळ्या महाराष्ट्राला होती. त्यांचाच मी चेला आहे. या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली. ठाणेकरांनी मर्सिडीज गाडीला नाही, तर दाढीला साथ दिली."

मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर केलेल्या हल्लावर 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरे गटानं याची सुरूवात केली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं हे कुणालाही आवडलं नाही. शेवटी 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळते. पण, याचं कुठलंही समर्थन करणार नाही," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

"आम्ही सत्तेत आल्यापासून हे 'सरकार घटनाबाह्य आहे', 'एक महिन्यात पडणार' असं बोललं जातं. दोनवर्षे झाली, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेले. कारण, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले नाहीत. त्यामुळे लोक आमच्यासोबत येत आहे. ज्यांनी विचार सोडले, त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. म्हणून आपले ध्येय, विचार ठरवले पाहिजे. सत्तेसाठी कुठलीही तडतोड आम्ही केली नाही," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com