Eknath Shinde : "आघाडीला जनताच जोड्याने मारेल" 'मविआ'च्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची सडकून टीका

Eknath Shinde On Mahavikas Aghadi : "महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अतिशय दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही बाब संवेदनशील आहे. महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत."
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 01 September : मालवण (Malvan) येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईत जोडे मारो आंदोलन करत सरकारविरोधात मोर्चा काढला होता.

मात्र, जोडे मारो आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीलाच जनताच जोडे मारणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन मोर्चा काढण्यात आला.

गेट वे ऑफ इंडिया येथे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) प्रमुख नेते आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी 'गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही' अशी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र, हा मोर्चा शिवरायांच्या प्रेमासाठी नव्हे तर राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

CM Eknath Shinde
Mahayuti News : अजित पवार गटावर कसला दबाव? तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने उपस्थित केला सवाल

'मविआ'च्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले, "महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अतिशय दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही बाब संवेदनशील आहे. महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाहीत तर ते आमच्या अस्मितेचा विषय आहेत. मात्र, घडलेल्या घटनेचं राजकारण विरोधक करतायत हे जास्त दुर्दैवी आहे."

CM Eknath Shinde
Tanaji Sawant : शिवसेनेत मतभेद! शिंदे गटातील नेत्यानं तानाजी सावंतांचा एकेरी उल्लेख करत थेट लायकीच काढली

कर्नाटकात काँग्रेस (Congress) सरकारने बुलडोझरने शिवाजी महाराजांचा पुतळा दोन जेसीबी लावून तोडला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनताच जोड्याने मारणार आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com