Tanaji Sawant : शिवसेनेत मतभेद! शिंदे गटातील नेत्यानं तानाजी सावंतांचा एकेरी उल्लेख करत थेट लायकीच काढली

Tanaji Sawant Latest News : तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याची लायकी काढल्यानंतर त्यांच्या सर्व स्तरातून टीका होत आहे. यातच पक्षातील नेत्यानच तानाजी सावंत यांच्या तोफ डागली आहे.
eknath shinde tanaji sawant
eknath shinde tanaji sawant sarkarnama
Published on
Updated on

मंत्री तानाजी सावंत यांनी सतत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच मंत्री सावंत यांनी शेतकऱ्याची लायकी काढल्यानं वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्याची लायकी काढल्यानं शिंदेंच्या शिवसेनेतील नेता मंत्री सावंत यांच्यावर भडकला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेतील सोलापूर जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांचा एकेरी उल्लेख करत फटकारलं आहे. "शेतकऱ्याची लायकी काढण्याएवढा तू लायकीचा झाला नाही," अशी टीका मनिष काळजे यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

eknath shinde tanaji sawant
Tanaji Sawant : ठिणगी पडली! तानाजी सावंत पक्षात गद्दारी करत आहेत, 'CM'नी हकालपट्टी करावी; शिंदे गटातील नेता आक्रमक

मनिष काळजे म्हणाले, "शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याबद्दल आनंदाचं वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली आहे. अशा मंत्र्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला, तर दुर्दैव घडेल."

"शेतकऱ्याची लायकी काढण्याइपत तू लायकीचा नाही. शेतकरी हा कष्टातून आणि घामातून मोठा होता. शेतकऱ्यानं प्रश्न विचारल्यानं तू जर लायकी काढत असचील, तर आपल्या बुद्धीची मला कीव येते," असं हल्लाबोल

eknath shinde tanaji sawant
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची अवस्था 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतयं' 'हे' नेते कारणीभूत

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

धाराशिव येथील एका शेतकऱ्यानं तानाजी सावंत यांना बंधाऱ्यावरून प्रश्न विचारला होता. त्यावर तानाजी सावंत भडकले आणि शेतकऱ्याला सुपारीबाज म्हणत लायकी काढली. "गेली 15 वर्ष आपण ब्र शब्द काढला नाही. रस्तावर पाठिभर मुरुम कोणी टाकला पाहिलं नाही. 35 वर्ष फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं. 16 हजार कोटी खर्च केले असून 95 टक्के पाणी शेतात येत आहे. सुपारी घेऊन बोलायचं नाही. आम्हालाही कळतं. त्यामुळे लायकीत राहून बोलायचं. ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही. मी गेल्या पाच वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही. मी विठ्ठलाचा भक्त आहे," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com