Rahul Gandhi vs Shivsena : शिवसेना सोडून मी राहुल गांधीच्या मागे जाईल; असं का म्हणाले विश्वनाथ भोईर

Vishwanath Bhoir : कल्याणमध्ये ६ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन
Vishwanath Bhoir
Vishwanath BhoirSarkarnama

Mumbai News : "मी माफी मागायला सावरकर नाही. मी गांधी आहे. आणि गांधी माफी मागत नसतात," या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानामुळे भाजप आक्रमक झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यासह देशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून चांगलेच वातारण तापल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

या यात्रेच्या माध्यमातून भाजप नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, आज मुंबईतील चारकोप येथे सावरकर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Vishwanath Bhoir
Devendra Fadnavis on Savarkar : उद्धव ठाकरेंचा मित्र असा उल्लेख करत फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) आणि भाजप यांच्याकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. कल्याणमध्येही ६ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना आणि भाजप (BJP) यांच्याकडून कल्याणामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राहुल गांधी यांना राहुल खान म्हणून संबोधित केले. तसेच राहुल गांधी यांना एक दिवस कोहलुला जुपा, त्यानंतर मी शिवसेना सोडून राहुल गांधींच्या मागे जाईल, असे खुले आवाहन केले.

Vishwanath Bhoir
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

आमदार विश्वनाथ भोईर (VIshwanath Bhoir) म्हणाले, "राहुल गांधींना एक दिवस कोहलुला जुपा मी खरोखर सांगतो मी शिवसेना सोडून देईल आणि राहुल गांधींच्या मागे येईल. त्यांनी फक्त एक दिवस कोहलू चालवून दाखवावा. ज्यांनी आयुष्यभर कोहलू चालवला अशा प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलण्याचा या पप्पूला अधिकार काय? त्यांचे कर्तृत्व काय, काय त्यांनी केलेले आहे. आता काँग्रेसवालेही त्यांना कंटाळलेले आहे. मात्र त्या बिचाऱ्यांना नाईलाजास्तव त्यांना झेलावे लागते. म्हणून त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही."

Vishwanath Bhoir
Rahul Gandhi in Surat : सूरत पाकिस्तानात आहे का? अडवणुकीनंतर नाना पटोलेंचा संतापजनक सवाल

दरम्यान, 'मोदी आडनावा'वरुन केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी. त्यानंतर परदेशात जाऊन राहुल यांनी भारताच्या लोकशाहीवर शंका उपस्थित केल्याने प्रतिमा मलिन झाली, असा आरोप करून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी वारंवार भाजपच्या वतीने करण्यात येत होती. दरम्यान, 'मोदी आडनावा'वरील विधानामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. त्यामुळे गांधी यांची खासदारकीही रद्द झाली. मात्र राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला. भाजपच्या मागणीवर त्यांनी, 'मी माफी मागायला सावरकर नाही. गांधी आहे. गांधी कधी माफी मागत नाहीत', असे विधान केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com