Mumbai News, 07 May : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने अखेर बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे नऊ कॅम्प्स भारतीय सैन्याने जमीनदोस्त केले आहेत.
या मोहीमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. या कारवाईनंतर देशभरातून सैनिकांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राजकीय नेत्यांनी देखील सैन्याच्या कारवाईचं कौतुक केलं आहे.
जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भारतीय सैन्यदलावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी लिहिलं की, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!, अशा शब्दात त्यांनी भारतीय लष्कराने पाकवर केलेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.