Madhav Bhandari : सर्व्हे महत्त्वाचे नाहीत, आमचे आमदार जास्त, आम्हीच...; माधव भंडारींच्या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चलबिचल

BJP Madhav Bhandari statement on seat allocation in the Grand Alliance : महायुतीतील जागा वाटपावर कार्यकर्ते, आमदारांनी जाहीरपणे बोलण्यापेक्षा आपपाल्या नेतृत्वाजवळ मतं मांडावीत. भाजपच्या विद्यमान आमदार असलेल्या जागा आमच्याकडेच राहतील, असे माधव भंडारी यांनी सांगितले.
Madhav Bhandari
Madhav Bhandari Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीत जागा वाटपाबाबत अस्वस्थता आहे. महायुतीमधील प्रमुख तिन्ही पक्षांमध्ये जागा खेचाखेचावर अधिक भर आहे. यावरून तिन्ही पक्षातील प्रमुख नेते, आमदार उघडपणे विधान करत आहेत.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी महायुतीमधील जागाबाबत मोठं विधान करत भाजपकडे सर्वाधिक जागा राहतील आणि लढेल देखील, असं स्पष्ट केलं. माधव भंडारी यांनी हे विधान करताना जागा वाटपावर विधान करणाऱ्या उत्साही आमदारांना फटकारल्याने महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चलबिचल झाली आहे.

भाजपचे (BJP) प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, "विद्यमान आमदार ज्यांचे आहेत, त्या जागा आम्ही लढवणार आहोत. कोण काय सर्व्हे करतो हे फार महत्त्वाचे नाही. कार्यकर्त्यांनी उत्साहाने आपली भूमिका जाहीपणे व्यक्त न करता आपपाल्या नेत्याकडे व्यक्त करावी, मांडावी. वरि्ष्ठ नेते एकत्रित चर्चा करतील. निर्णय घेतील". मात्र विद्यमान आमदार जिथ आहेत त्या जागा त्यांनाच मिळतील, असेही भंडारी यांनी म्हटले.

Madhav Bhandari
Uddhav Thackeray : शिवसैनिक बेचैन, अस्वस्थ... ठाकरेंसाठी मिलिंद नार्वेकरांमार्फत धाडलं पत्र... कारण की!

बांगलादेशातील स्थितीवर माधव भंडारी यांनी भारत सरकारची भूमिका मांडली. बांगलादेशाची राजकीय स्थिती स्थिर राहावी, तेथील हिंदुना संरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारत सरकारची सकारात्मक भूमिका राहिली आहे. या यश देखील आले आहे. भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दिशेने आहे. अमेरिका, चीन या दोन देशांबरोबर रशिया आणि भारत हे देश अग्रेसर आहे. त्यामुळे भारत संपविण्याच्या कट अमेरिका आणि चीनकडून होत आहे. त्यामुळेच अमेरिकेत अनेक वर्ष आश्रय घेतलेल्या महम्मद युनुसला काळजीवाहू पंतप्रधान बनविण्यात आल्याचे माधव भंडारी यांनी सांगितले.

Madhav Bhandari
Video Assembly Election : मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार, निवडणूक आयोग घोषणा करणार

काँग्रेसच्या विचारसणीवर टीका

काँग्रेसचे (Congress) सलमान खुर्शीद यांच्यावर माधव भंडारी चांगलेच संतापले. बांगलादेशाप्रमाणे भारतात देखील राजकीय अस्थिरता माजेल आणि पंतप्रधानाच्या निवासस्थानीदेखील जनतेच्या झुंडी शिरतील, यासारखे मत उघडपणे काँग्रेसचे सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले. मात्र भारतीय जनता सुजाण असून काँग्रेसच्या विचारसरणीची पाठराखण जनता करणार नाही, असा दावा केला. बांगलदेशातील हिंदू आणि मुस्लिम निर्वासित म्हणून भारतात येणार असतील, तर समस्या वाढतील. यामुळे बांगलादेशाचा विषय भारतासाठी महत्त्वाचा आहे, असेही माधव भंडारी यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com