Nana Patole Attack On BJP : दिल्ली सरकारमधील ‘हम दो, हमारे दो’ नेत्यांचे महाराष्ट्र हे एटीएम; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

Mahavikas Aghadi Sabha : दिल्लीत बसलेले ‘हम दो, हमारे दो’ महाराष्ट्रातील पैसा मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊन राज्याला कंगाल आणि भंगार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचं एटीएम विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून बंद करायचं आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 16 August : भ्रष्टाचाराने मोठ्या प्रमाणात कमावलेला पैसा राज्य सरकारकडे आहे. दिल्लीत सरकारमध्ये बसलेले जे दोन नेते आहेत, त्यांचं एटीएमच महाराष्ट्र आहे. दिल्लीत बसलेले ‘हम दो, हमारे दो’ महाराष्ट्रातील पैसा मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊन राज्याला कंगाल आणि भंगार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यांचं एटीएम आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून बंद करायचं आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संयुक्त सभेत बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य आणि केंद्र सरकारला झोडपून काढले. ते म्हणाले, महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटला आहे. महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार घाबरले आहे. हे घाबरलेले सरकार नवनवीन जीआर काढत आहे. मोर्चे काढणाऱ्या विरोधकांवर आता गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सत्तेचा माज आलेला भाजप (BJP) राज्य आणि देशात हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे.

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी अशी लोकशाहीची दोन चाके असतात. पण भाजपने द्वेषाने राहुल गांधी यांना स्वातंत्रदिनानिमित्त अपमानित करण्याचे काम केले आहे. विरोधी पक्षनेत्याला दिलेली वागणूक ही लोकशाहीवरील हल्ला आहे. लोकशाहीचा अपमान करणाऱ्या व्यवस्थेला समूळ नष्ट करण्यासाठी आज आपण शंखनाद करत आहोत, असेही पटोले यांनी नमूद केले.

नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील पैसा राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत, गरीबांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंंत देण्याचे काम आपल्या करायचे आहे. परवा या सरकारला सर्वोच्च न्यायालयानेही झोडपले. शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, नवनवीन योजनांवर खर्च कसा करता, असा सवाल सरकारला केला आहे.

Nana Patole
Shishupal Patle : विदर्भात भाजपला पुन्हा धक्का; माजी खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, कर्मचारी भरतीसाठी पैसे नाहीत. पेपर लिकेज केले जातात. पेपर रद्द केले जातात, त्यातून विद्यार्थ्यांच्या जीवशी खेळण्याचे प्रकार केले जात आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेप्रमाणे लाडकी बहिण योजनेत दिलेला पैसाही वसूल केला जाऊ शकतो. कारण, या योजनेच्या अटी-शर्ती अजूनही तयार केलेल्या नाहीत. पण त्यांचा लाडक्या खुर्चीसाठी हा प्रयत्न सुरू आहे, असे सध्याचे चित्र आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला योजना सुरू करायच्या आहेत. कर्नाटक, तेलंगणमध्ये लाडक्या बहिणीला महाराष्ट्रापेक्षा जास्त पैसे दिले जातात. पण, आम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही घोषणा करायच्या नाहीत.

कर्जमाफीचा निर्णय आम्ही महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरुवातीलाच घेतला होता. नियमित कर्ज भरणाऱ्या प्रोत्साहन अनुदान आमचे सरकार आल्यानंतर देण्यात येईल, अशी घोषणाही नाना पटोले यांनी या वेळी केली.

Nana Patole
Kagal Politics : कागलचं राजकारण पेटलं, मुश्रीफांनी विरोधी नेत्याची औलाद काढली

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय नेतेमंडळी घेतील

मुख्यमंत्री कोण होईल, अशी चर्चा केली जात आहे. आम्हाला मुख्यमंत्री कोण होईल यापेक्षा गुजरातधार्जिणे सरकार घालवायचे आहे. जनतेच्या हिताचे सरकार आणण्याचा आमचा संकल्प आहे. मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय आमचे सर्व नेतेमंडळी बसून करतील, ते आमचं काम नाही, असे सांगून नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर पडदा टाकण्याचे काम केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com