
Mumbai News: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. तब्बल 230 जागा जिंकल्यानंतर महायुती राज्यात बहुमताचं सरकार स्थापन करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील ओलांडता आलेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी विधानसभेच्या निकालावर शंका उपस्थित केली आहे. शिवाय अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावरील मतमोजणीत तफावत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी आणि काँग्रेस ईव्हीएमच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसकडून 'ईव्हीएम छोडो' आंदोलन केलं जाणार आहे. तर शरद पवारांनी देखील पराभूत उमेदवारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते अंबादानस दानवे यांनी पुरावे गोळा करून आपण कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता विरोधक 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावरून राज्यभरात रान उठवणार असल्याचं दिसत आहे. एककीडे विरोधक आंदोलनाच्या तयारीत असतानाच निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
राज्यात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्याते अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की, राज्यभरात निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात तफावत असल्याच्या तक्रारी कुठेच आलेल्या नाहीत, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.