
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये येण्यासाठी उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. गणेशोत्सव आणि मुंबईतील रहदारी लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी परवानगीशिवाय आंदोलन करू नये, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्याचवेळी पोलिसांनी मुंबईत आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये, असेही निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी दुसरा पर्याय देण्याची मुभा सरकारला आहे. त्यानुसार नवी मुंबईतील खारघर इथे पर्यायी मैदान उपलब्ध करून देता येईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. गणपती उत्सवादरम्यान, अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे मुंबईत रहदारी विस्कळीत होईल, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर ताण येईल, अशी चिंता न्यायालयाने आदेशामध्ये व्यक्त केली.
29 ऑगस्ट मनोज जरांगे पाटील यांनी रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली होती. या ठिकाणी ते आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी राज्यभरातील सर्व आंदोलकांना आझाद मैदानात येण्याचं आवाहन केले होते. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून ते मार्गस्थ होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो गाड्या आणि हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याचा दावा आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतरही जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. ते म्हणाले की, आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु. पण आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार. आमचे वकील बांधव न्यायालयात जातील, न्यायदेवता न्याय देईल. मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.