Mumbai News : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करीत असताना मराठा आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जरांगेंना पत्र लिहिले असल्याचे समजते.
सुनील बाबूराव कावळे (वय ४५, चिकनगाव, ता. अंबड, जि. जालना) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येनंतर मराठा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनील कावळे हा एकटाच जालण्याहून मुंबईत आला होता. बांद्रा परिसरात त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वतःच्या शर्टवर आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कावळे याच्या बॅगमध्ये पोलिसांना मोबाईला फोन आणि एक सुसाइड नोट सापडली आहे. नोटच्या शेवटी त्याने सर्वांची माफीदेखील मागितली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे. सुनील कावळे याच्या आत्महत्येनंतर आता मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाब वाढण्याची शक्यता आहे. मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.