काॅंग्रेसच्या मंत्र्यांची खाती बदलणार का, यावर नाना पटोले म्हणाले...

Nana Patole यांच्या विधानानंतर राज्यात येत्या दहा मार्चनंतर राजकीय फेरबदल होणार असल्याची चर्चा
Nana Patole-Rahul Gandhi
Nana Patole-Rahul GandhiSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसकडील मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्याचा अधिकार पक्षाच्या हायकमांडला असल्याचे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गुरुवारी केले. मात्र, सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांना कामाला लावण्याचा अधिकार माझ्याकडे असल्याने ते मी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १० मार्चनंतर सरकारमधील बदलाच्या आपल्या विधानाचा वेगळा अर्थ काढल्याचा मोजकाच खुलासा पटोले यांनी केले.

Nana Patole-Rahul Gandhi
कॉग्रेसमध्ये मोठा बदल; पटोलेंच्या निर्णयाला पक्षश्रेष्ठींकडून स्थगिती

सरकारमध्ये येत्या १० मार्चनंतर काही दुरस्ती करण्यात येणार असल्याचे पटोले यांनी जाहीर केल्याने मंत्रिमंडळातील बदलाच्या चर्चेला रंगत आहेत. त्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने मंत्रिमंडळातील बदल अटळ असल्याचेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी आपल्या विधानावर नव्याने भूमिका मांडली. मोदी आणि त्यांच्या सहकारी नेते असंवेदशील असून, महाराष्ट्राचा उघडपणे अवमान करूनही त्यांना काहीच वाटत नाही. त्यामुळे नव्या पध्दतीने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole-Rahul Gandhi
पक्षाची कोंडी आणि नेत्यांची मुस्कटदाबी : काॅंग्रेसच्या तक्रारींवर ठाकरेंनी केले आश्वस्त!

पक्ष संघटना विस्तारण्यासाठी काँग्रेस प्रदेश समितीकडून नव्या पदाधिकारी नेमणुकांचा सपाटा लावला होता. त्यातूनच कार्याध्यक्षपदांवर नेमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांना स्थागित देऊन, या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदावर काम करण्याचा आदेश दिला आहे. या नेमणुकांबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर त्या स्थगित करण्याचा आदेश हायकमांडने प्रदेशाध्यक्षांना दिला. त्यानंतर जुन्या कार्याध्यक्षांना जिल्हा उपाध्यक्षपदावर काम करण्याची सूचना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole-Rahul Gandhi
दहा मार्चनंतर नाना पटोलेंचे नशीब पालटणार? मोठ्या घडामोडींची चिन्हे...

कोरोना पसरविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेसने आता पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. परंतु, नेत्यांच्या घरे, रस्त्यांवर आंदोलन करण्यापेक्षा मोदी यांनी माफी मागावी म्हणून पक्षाच्या वतीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पत्रे पाठविण्यात येणार आहेत. मोदी यांनी माफी मागावी आणि प्रायश्चित करावे, अशा अशयाची पत्रे फडणवीस यांच्यामार्फत मोदींकडे पाठविली जातील, असेही पटोले यांनी सांगितले. शिवजयंतीपर्यंत रोज एका व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांच्या घरी पत्रे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com