Rohit Pawar : सरकार सांगतंय एक अन् वस्तुस्थिती मात्र पूर्ण उलटी, रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar On Devendra Fadnavis : शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी अधिवेशनामध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. सोयाबीन शेतकरी हवालदिल झाला असून सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याबाबत प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपण रेकॉर्ड ब्रेक सोयाबीन खरेदी केले असल्याचे सांगितलं.
Devendra Fadnavis -Rohit Pawar
Devendra Fadnavis -Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 Dec : शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी नागपूर (Nagpur) येथील अधिवेशनामध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. सोयाबीन शेतकरी हवालदिल झाला असून सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याबाबत प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपण रेकॉर्ड ब्रेक सोयाबीन खरेदी केले असल्याचे सांगितलं.

मात्र, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नागपूर येथील अधिवेशना दरम्यान विधानसभेमध्ये बोलताना गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन व कापूस उत्पादकाला योग्य मदत दिली जात असल्याचं सांगितलं.

तसेच राज्यात 557 हमी भाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत जवळपास 23 लाख 68 हजार 475 क्विंटल इतकी सोयाबीन खरेदी करण्यात आली असून मागील पंधरा वर्षाच्या तुलनेत ही रेकॉर्ड ब्रेक खरेदी असल्याचं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. त्या सोबतच ही खरेदी केंद्रे 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Devendra Fadnavis -Rohit Pawar
Dhananjay Munde : 'मंत्रिमंडळात सहभागी करु नका', प्रचंड विरोधानंतरही खातं मिळताच धनंजय मुंडेंनी केलेली पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

मध्य प्रदेशच्या धरतीवर खेरेदी व्यवस्था सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिऱ्यांना सूचना दिल्या असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. याबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. पवार म्हणाले, सोयाबीनचे भाव पडले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात विक्रमी खरेदी केली जात असल्याचे सांगितले असले तरी वस्तुस्थिती मात्र पूर्णतः उलट आहे. राज्यात 74 लाख टनाहून अधिक उत्पादन असताना सरकार केवळ 14 लाख टन खरेदी करणार असून त्यातही आतापर्यंत केवळ 15% खरेदी झालेली आहे. सद्यस्थितीत एकतर राज्यसरकारने वेगाने खरेदी करावी, तसेच केवळ 14 लाख टन उद्दिष्टाने महाराष्ट्रातल्या केवळ 18 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होऊ शकते.

Devendra Fadnavis -Rohit Pawar
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल, CM फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर कारवाईला वेग

त्यामुळे सरकारने खरेदीचे टार्गेट वाढवायला हवे. सरकारच्या खरेदीला उशीर झाल्याने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन आधीच अत्यंत कवडीमोल भावात विकले आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही 3000 रुपये प्रति क्विंटल मदत द्यावी.नवे सरकार नवे मंत्री नक्कीच शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने बघतील, अशी अपेक्षा असल्याचे रोहित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com