नुपूर शर्मा योग्यच बोलल्या, पण त्यांना वेगळा न्याय का? राज ठाकरेंचा सवाल

MNS |Raj Thackeray| असदुद्दीन ओवेसी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलतात त्यांना माफी मागायला का लावत नाही
MNS |Raj Thackeray|
MNS |Raj Thackeray|

मुंबई : भाजप नेत्या नुपूर शर्माच्या बाबतीत काय घडले, नुपूर शर्मा जे बोलल्या ते योग्यच बोलल्या. मी शर्माची बाजू घेतली. आज असदुद्दीन ओवेसी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलतात त्यांना माफी मागायला का लावत नाही, झाकीर नाईकला वेगळा आणि नुपूर शर्माला वेगळा न्याय का असाही सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. कवी इक्बाल सारे जहाॅं से अच्छा हिंदौस्तां हमारा म्हणतात. कवी कवी इक्बाल हिंदौस्तां म्हणतात आणि आम्ही भारत म्हणतो.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (23 ऑगस्ट) मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात मनसे मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारणातील अनेक घडामोडींकडे लक्ष वेधले. ''जनतेने मत युतीला दिली पण महाविकास आघाडी सरकार अस्तित्त्वात आलं. ज्यांचे जास्त आमदार त्यांना मुख्यमंत्रीपद अशी युतीची अंडस्टॅंडिंग होती. मग शिवसेनेने मग शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मागितलंच कसं, चार भिंतीत तुम्हाला कमिटमेंट कशी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांचं नाव घेतलं तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का नाही घेतला नाही, निकाला आधीच यांची बोलणी सुरु होती, असे अनेक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत.''

MNS |Raj Thackeray|
आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्रपूरची दीक्षाभूमी उपेक्षितच राहिली; आता विकास व्हावा !

"राज्यात सध्याचं राजकीय वातावरण चांगल नाही. जनता जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यतं असच सुरु राहणार. नेत्यांची या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरु आहेत.त्यांना मते देणाऱ्यांची कमाल वाटते, असे म्हणत महाराष्ट्रात राजकारणाचा खेळखंडोबा मांडला आहे. असा हल्लाबोलही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

मी शिवसेना सोडली पण मी खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. माझं बंड नव्हते, मी सांगून बाहेर पडलो. बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही. स्वत:चा पक्ष उभा केला. कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष उभा केला, असंही यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आंदोलनं अर्धवट सोडतात असा आरोप मनसेवर केला जातो, परंतु राज ठाकरे आज आपल्या भाषणातून आव्हान देत म्हणाले की, 'एक आंदोलन दाखवा जे आम्ही अर्धवट सोडलं. टोल आंदोलनामुळे महाराष्ट्रातील 67 टोलनाके बंद झाले. भोंगा आंदोलन यामुळे जवळपास 92 % भोंगे बंद झाले. आम्हाला सत्ता न देता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, पण हाती सत्ता द्या महाराष्ट्रातील टोल बंद करून दाखवतो, असेही राज ठाकरे म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com