
Mumbai News, 10 Aug : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेत अनेक बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा करत त्यांनी याबाबतचे पुरावे देखील सादर केले.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी आपणाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.
दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवार ते इतक्या दिवसांनी का बोलत आहेत? असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले," राहुल गांधींना भेटल्यावरच याबाबतची त्यांना आठवण का आली?
इतक्या दिवसानंतर ते आजच अचानक का बोलले? राहुल गांधी ज्या प्रकारे सलीम-जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज नवीन कपोकल्पित कहाण्या सांगतात तशी अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना?"
तर अनेक वर्ष राहुल गांधी ईव्हीएमबद्दल बोलत होते तरी शरद पवार बोलत नव्हते. त्यांनी अनेकदा ईव्हीएमला दोष देणं आयोग्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आता अचानक ते बोललेत म्हणजे हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.