Raj Thackeray news : केंद्रीय मंत्र्यांचा राज ठाकरेंवर घाव; मुंबई अन् गुजरातचे मजबूत नाते सांगत म्हणाले, महाराष्ट्राच्या भल्यासाठी...

Ramdas Athawale’s sharp advice to Raj Thackeray : मुंबई ही महाराष्ट्राचा एक अविभाज्य अंग असली तरी मुंबईचे गुजरातशीही एक ऐतिहासिक आणि मजबूत नाते आहे, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai and Gujarat’s political and cultural bond : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मुंबई अन् गुजरातच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

रामदास आठवले यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करून राज ठाकरेंना राजकारणाचे धडेही दिले आहेत. केवळ जोरदार भाषणे आणि चर्चात्मक साऊंडबाइट्सच्या आधारे महाराष्ट्राचे नेतृत्व केले जाऊ शकत नाही, असे आठवले म्हणाले आहे. मुंबई आणि गुजरातचे वर्षानुवर्षाचे नाते असल्याचेही मोठे विधानही त्यांनी केले आहे.   

राज ठाकरे आजही जे करत आहेत, ते मुंबईचा इतिहास आणि मुंबईची ओळख त्यांना समझली नाही, असेच वाटते. मुंबई ही महाराष्ट्राचा एक अविभाज्य अंग असली तरी मुंबईचे गुजरातशीही एक ऐतिहासिक आणि मजबूत नाते आहे. गुजराती आणि मराठी समाजाने वर्षानुवर्षे एकत्रितपणे मुंबईला उभे केले आहे. मुंबईला आर्थिक आणि सांस्कृतिक रुपाने समृध्द केले आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray News : राज ठाकरेंचा एकच शब्द 'महायुती'च्या पोटात गोळा आणणारा; पहिल्यांदाच थेट भाष्य...

मुंबई ही केवळ महाराष्ट्राची शान नसून या शहराचा एक भाग गुजरातच्या आत्मियतेशीही जोडलेला आहे. आज राज ठाकरे जे करत आहेत, ते एक संकुचित आणि विभाजनकारी राजकारण आहे. त्यामुळे मुंबईच्या आत्म्याला ठेच लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी संघर्ष केला होता. पण त्यांनीही कधीही या शहराला संकुचित नजरेतून पाहिले नाही. इथे गुजराती असो वा मराठी सगळे मुंबईकर आहेत.

Raj Thackeray
Donald Trump News : PM मोदींचं नाव घेत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी; दिवाळीत धमाका करणार ?

राज ठाकरे यांच्याकडे भाषणाची शैली आहे. व्यंगात्मक टिप्पणी करण्याची कला आहे. पण त्याचा ठोस किंवा रचनात्मक परिणाम समोर येत नाही. त्यांना खरंच महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही करायचे असेल तर त्यांनी आंबेडकरी आंदोलन, बहुजन विकास आणि शैक्षणिक सुधारणांसारख्या गंभीर मुद्द्यांवर काम करायला हवे. केवळ जोरदार भाषणे आणि चर्चात्मक साऊंडबाइट्सच्या आधारे महाराष्ट्राचे नेतृत्व केले जाऊ शकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com