मुंबई : 'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली १५३ अ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले.पोलिसांनी विविध मुद्दांवर पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राणांना १४ दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.अॅड रिझवान मर्चंट आणि अॅड वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा यांची तळोजा कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे. त्यांच्या कोरोना अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता सरकारला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,''
राणांचे वकीस रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन दुपारी मागे घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावलेल्या कलमांवर देखील मर्चंट यांनी आक्षेप घेतला आणि अटकेचा विरोध केला आणि पोलिस कोठडी देण्यासही विरोध केला.
राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे, अशात राणा यांनी मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालिसाचे पठन करण्याचं आवाहन दिल्यामुळे कायदा व सुव्यवस्थचा प्रश्न उपस्थित झाला होता.
पोलिसांनी १४९ सीआरपीसीची नोटीस राणांना धुडकावत, माध्यमांना आक्रमक प्रतिक्रिया दिली. मातोश्रीवर जाण्याबाबत भडकावू भाषण दिले.
पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत हे माहित असताना, कलानगर येथे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल असा मोठा कट होता किंवा कसे याचा तपास होणे गरजेचे आहे.
मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. जाणीव पूर्वक राजकीय तेढ निर्माण करत जाणीवपूर्वक दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न.
कोण साथीदार आहेत त्याचा तपास होणं गरजेचा आहे
या गुन्ह्यात आरोपींना हा गुन्हा करण्यासाठी कोणी चिथावणी दिली याचा पोलिसंना तपास करायचा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.