
Mumbai News:रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी (Anil Ambani)यांनी त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. 24 जुलै रोजी ईडीने (प्रवर्तन निदेशालय) अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या विरोधात छापेमारी केली होती, दोन-तीन दिवस चौकशी सुरु होती.
आता ईडीनं खुद्द अनिल अंबानी यांनाच समन्स बजावले आहे. येत्या 5 तारखेला ईडीच्या कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 17 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत ही चौकशी होणार आहे.
ईडीने काही दिवसापूर्वी अनिल अंबानी यांच्या कंपन्यावर छापेमारी केली होती. यात अनेक महत्वाचे कागदपत्र, संगणक जप्त करण्यात आले आहे. बँक कर्ज प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (PMLA)ही कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्या कंपन्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्स ग्रुपच्या 50 कंपन्या आणि 25 जणांची चौकशी करण्यात आली. मुंबईत 35 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
2017-2019 या दरम्यान एका बँकेतून सुमारे 3 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. त्या रक्कमेचा चुकीच्या कामासाठी उपयोग करण्यात आला, असा आरोप ईडीनं केला आहे. अंबानी यांच्या कंपनींना कर्ज देण्यापूर्वी संबधीत बँकेला मोठ्या प्रमाणात 'धनलाभ'झाला होता, असे ईडीने म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर ईडीचे अधिकारी तपास करीत आहेत.
ज्या बँका आणि आर्थिक कंपन्यांची आर्थिक परिस्थित कमकुवत असताना त्यांना अन्य मार्गांनी लाभ कसा झाला, याची चौकशी ईडी करीत आहे. बँकांनी काही कंपन्यांना दिलेले कर्जाचा वापर अन्य चुकीच्या कारणासाठी केला गेला आहे. कंपन्यांचे संचालक, त्यांनी सादर केलेले कागदपत्रे यात अनेक त्रूटी ईडीला आढळले असल्याचे ईडीच्या तपासात आढळले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.