शिंदेंची सुरक्षा : सुहास कांदेंच्या आरोपांना देसाई, केसरकर, भुसेंकडून दुजोरा

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिंदे गटातील आमदार सुहास कांदे (suhas kande)यांनी आज गंभीर आरोप केले आहेत. कांदेंच्या आरोपांना शिंदे गटातील नेते दीपक केसरकर, दादा भुसे, शंभूराजे देसाई यांनी दुजोरा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धोका असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारली असल्याचा गंभीर आरोप सुहास कांदेंनी केला आहे. या आरोपाला माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दुजोरा दिला आहे. देसाई माध्यमांशी बोलत होते.

"एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी साडेआठवाजता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shiv Sena : आम्हाला डिवचलं तर महागात पडेल ; केसरकरांचे ठाकरेंना आव्हान

एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी देऊनही त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही, असा गंभीर आरोप आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पत्रकार परिषदेत राज्याचे माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली.

माजी मंत्री दादा भुसे यांनीही सुहास कांदेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. 'एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेच्या बाबतचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. यावर चर्चा झाली होती,' असे त्यांनी सांगितले.

दादा भुसे म्हणाले, "ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून धमकी येताच त्यांच्या सुरक्षेबाबतचा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. मात्र यावर चर्चाच करण्यात आली नाही. शिवसेना वाढवण्यासाठी अनेकांनी जीवाचे रान केले. त्यामुळे शिवसेना उभी राहिली. मात्र अशा कट्टर शिवसैनिकांकडेच दुर्लक्ष करण्यात आले.

केसरकर म्हणाले,"कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली आहे. गोपनियता म्हणून त्यावेळी काय झालं हे सांगू शकत नाही. बाकी शंभूराजे देसाई बोलले आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com