BJP News : महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा ट्विस्ट, शरद पवार- उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार? माजी मंत्र्यांचं मोठं विधान

Sharad Pawar & Uddhav Thackeray Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी ज्या प्रकारे भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या केंद्रातील भाजप नेत्यांकडून केली जात आहे
Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एकीकडे येत्या 23 जानेवारीला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचं विधान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मोठी धाकधूक वाढली आहे. अशातच आता माजी मंत्र्यांनेच शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंबद्दल मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे मंगळवारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे केंद्रात लवकरच भाजपसोबत दिसतील असं विधान केल्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

कडू म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी ज्या प्रकारे भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या केंद्रातील भाजप नेत्यांकडून केली जात आहे, असा दावाही कडू यांनी यावेळी केला आहे.

Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : कोकणात राजकीय भूकंपाला सुरुवात; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; साळवींचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

केंद्रातील भाजपकडून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा प्रामुख्याने विचार सुरू आहे. ठाकरे-पवारांकडील असलेली खासदारांची संख्या हे त्यामागचं कारण आहे. त्यामुळे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे, असंही कडू यांनी सांगितलं.

संजय राऊत यांचा आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं.यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.यावेळी त्यांनी भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गरज सध्या संपलेली आहे.भाजपची ही मोघलाई नीती आहे. त्यामुळे त्यांच्यापासून लांब जातो, त्यांना ते कापून टाकतात,असंही विधानही माजी आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav Thackeray
PM Modi News : एक नव्हे तीन राज्यांचा स्थापना दिवस आहे एकाच दिवशी; मोदींनी दिल्या खास शुभेच्छा म्हणाले....

राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नाराजी असल्याच्या चर्चांवरही आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की, ते अति खूश असतात आणि जेव्हा ते अति खूश असतात तेव्हा ते खूप नाराज असल्याचीही मिश्किल टिप्पणीही यावेळी बच्चू कडू यांनी केली.

सरकारी योजनांमध्ये 2 ते 4 टक्के भ्रष्टाचार असतोच असं विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्यातील घोटाळ्याबाबत केलं. यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही मोठं विधान केलं आहे.ते म्हणाले,राज्यात आलेले सरकारच भ्रष्टमार्गाने आल्याने त्यातील मंत्रीही उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे,असा खोचक टोलाही त्यांनी कृषिमंत्र्यांना काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com