'मोदी सरकारला बाळासाहेबांना भारतरत्न व पद्मविभूषण का द्यावे वाटले नाही?'

शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut  Devendra Fadnavis
Sanjay Raut Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) भारतरत्न (Bharatratna) किंवा पद्मविभूषण (Padmavibhushn) पुरस्कार देऊन गौरव करावा असे केंद्र सरकारला (Central Government) का वाटले नाही, अशी खंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.

Sanjay Raut  Devendra Fadnavis
Tipu Sultan नामकरणावरून फडणवीस म्हणाले, सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राऊत यांच्यामध्ये सुरु असलेले शाब्दिक युद्ध आजुनही सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून करुन दाखवा. त्यांना बाळासाहेबांच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते, अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर राऊतांनी आज (ता.26 जानेवारी) संधी साधत प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने ट्विट केले नाही ही फडणवीस यांची वेदना आहे. मलाही त्यांची वेदना पाहून वेदना झाली. बाळासाहेब ठाकरेंना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करावा असे यांच्या केंद्र सरकारला का वाटले नाही?, असा सवाल करत राऊतांनी फडणवीस यांच्यासमोर अनपेक्षित प्रश्न उपस्थित केला. तसेच, बाळासाहेब ठाकरे भारतरत्न होतेच. तुमच्या केंद्र सरकारने बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही याचा खुलासा केला की आम्हाला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विटवर बोलता येईल,” असा टोला फडणवीसांना त्यांनी लगावला.

Sanjay Raut  Devendra Fadnavis
संकुलाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासूनच; भाजप धर्मांधतेचे वातावरण तयार करत आहे!

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांसोबत बोलताना राऊत म्हणाले, वीर सावरकारांना यावेळी भारतरत्न पुरस्कार मिळेल असे वाटले होते. पण सावरकर उपेक्षितच आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला. याबरोबर

राऊतांनी मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा थांबण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच, पश्चिम बंगालमध्ये तिघांनी पद्म पुरस्कार नाकारले आहेत. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य मोठे नेते आहेत. पुरस्कार देताना त्यांना विचारले गेले नसावे. अलीकडे उठसूठ कोणालाही पद्म पुरस्कार देण्याची परंपरा सुरु झाली आहे. त्यामुळे नाकारले जात आहेत. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र, जिवंतपणी त्यांची किंमत केली जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com